Vastu Tips: घरात तुळशीचे रोप लावणे शुभ की अशुभ?

मुंबई: हिंदू धर्मात तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जात.विविध प्रकारच्या धार्मिक कार्यात तुळशीच्या रोपाचा वापर केला जातो. हिंदू धर्म मानणाऱ्या अनेक लोकांच्या घरात तुळशीचे रोप असते. वास्तुशास्त्रात तुळशीचे रो घरात लावण्याबाबत बरंच काही सांगण्यात आले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप लावल्याने सुख-समृद्धी, वैभव आणि लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो.

घरात तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मकतेचे वातावरण राहते. तुमच्या घरात कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाहीत. घरात तुळशीचे रोप लावणे अतिशय शुभ मानले जाते. मात्र तुळशीचे रोप योग्य दिशेला लावणे अतिशय गरजेचे असते.

कधीही तुळशीचे रोप हे मोकळ्या जागेत लावले पाहिजे. यामुळे सूर्याची किरणे त्याला मिळतील. यामुळे तुळशीचे रोप लावण्यासाठी योग्य जागा हे घराचे मुख्य दार अथवा अंगण असते.

घरात एकापेक्षा अधिक तुळशीची रोपे असल्यास त्यांच्या संख्यांवर लक्ष द्या.

नेहमी विषम संख्या म्हणजेच १, ३, ५ अशी रोपे असावीत.

तुळशीच्या रोपांना कधीही रविवारी आणि एकादशीच्या दिवशी स्पर्श करू नये.

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले आहे. लक्ष्मी माता भगवान विष्णूंसाठी उपवास करते. यामुळे रविवारी रोपाला स्पर्श करू नये.
Comments
Add Comment

पाकिस्तानच्या 'खोट्या' फुटबॉल संघाचा जपानमध्ये पर्दाफाश

इस्लामाबाद: एका फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी जपानमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या 'बनावट' फुटबॉल संघाला जपानी

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधनाची विक्रमी शतकी खेळी

चंदीगड : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना चमकदार कामगिरी करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आणि

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत