नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या महामारीनंतरही जगाला अजूनही विविध आजारांचा विळखा असल्याचे दिसून येते. अशातच आरोग्य संघटनेने (World Health Organization) एका धोकादायक आजाराचा अहवाल मांडला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, टीबी (क्षयरोग) अत्यंत घातक संसर्गजन्य असा आजार आहे. हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज फैलावू शकतो. त्यामुळे टीबी कोरोना पेक्षा अधिक घातक आजार असल्याचे समोर आले आहे.
भारतात टीबीचे २६ टक्के रुग्ण आहेत. इंडोनेशिया १० टक्के, चीन ६.८ टक्के, फिलिपिन्स ६.८ टक्के आणि पाकिस्तानात ६.३ टक्के क्षयरोगाचे रुग्ण आहेत. ग्लोबल ट्यूबरकॉलॉसिस रिपोर्ट २०२४ नुसार या आजाराचे जगभरात ५६ टक्के रुग्ण आहेत. जगभरात हा आजार ५५ टक्के पुरुषांत, ३३ टक्के महिलांत तर १२ टक्के लहान मुलांमध्ये आढळून येतो. सन २०२५ पर्यंत भारतातून या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पण सध्याच्या परिस्थितीत भारतातच या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
दरम्यान, सध्या या आजारावर उपचार उपलब्ध असून उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरा होतो. मात्र उपचारास उशीर झाला तर रुग्णाचा मृत्यू होण्याचाही धोका असतो. त्यामुळे टीबीची काहीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांसी संपर्क करावा.
खोकला येणे, खोकल्याबरोबर रक्त येणे, छातीत वेदना होणे, श्वास घेण्यास आणि खाकरण्यास त्रास होणे, ताप, थंडी वाजून येणे, रात्रीच्या वेळेस घाम येणे, वजन कमी होणे, थकवा जाणवणे. क्षयरोगाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे या आजारात सारखा खोकला येत राहतो. तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ हा खोकला येत राहिला तर तुम्ही तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…