Health News : ‘हा’ आजार ठरतोय धोकादायक; जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक अहवाल!

नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या महामारीनंतरही जगाला अजूनही विविध आजारांचा विळखा असल्याचे दिसून येते. अशातच आरोग्य संघटनेने (World Health Organization) एका धोकादायक आजाराचा अहवाल मांडला आहे.


जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, टीबी (क्षयरोग) अत्यंत घातक संसर्गजन्य असा आजार आहे. हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज फैलावू शकतो. त्यामुळे टीबी कोरोना पेक्षा अधिक घातक आजार असल्याचे समोर आले आहे.



भारतात टीबीचे सर्वाधिक रुग्ण


भारतात टीबीचे २६ टक्के रुग्ण आहेत. इंडोनेशिया १० टक्के, चीन ६.८ टक्के, फिलिपिन्स ६.८ टक्के आणि पाकिस्तानात ६.३ टक्के क्षयरोगाचे रुग्ण आहेत. ग्लोबल ट्यूबरकॉलॉसिस रिपोर्ट २०२४ नुसार या आजाराचे जगभरात ५६ टक्के रुग्ण आहेत. जगभरात हा आजार ५५ टक्के पुरुषांत, ३३ टक्के महिलांत तर १२ टक्के लहान मुलांमध्ये आढळून येतो. सन २०२५ पर्यंत भारतातून या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पण सध्याच्या परिस्थितीत भारतातच या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

दरम्यान, सध्या या आजारावर उपचार उपलब्ध असून उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरा होतो. मात्र उपचारास उशीर झाला तर रुग्णाचा मृत्यू होण्याचाही धोका असतो. त्यामुळे टीबीची काहीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांसी संपर्क करावा.



काय आहेत टीबीची लक्षणे


खोकला येणे, खोकल्याबरोबर रक्त येणे, छातीत वेदना होणे, श्वास घेण्यास आणि खाकरण्यास त्रास होणे, ताप, थंडी वाजून येणे, रात्रीच्या वेळेस घाम येणे, वजन कमी होणे, थकवा जाणवणे. क्षयरोगाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे या आजारात सारखा खोकला येत राहतो. तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ हा खोकला येत राहिला तर तुम्ही तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या.

Comments
Add Comment

भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल

फाशीच्या शिक्षेवर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांची प्रतिक्रिया

ढाका - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना युनुस सरकारने स्थापने केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हे

बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे

Mumbai CNG Cut : मुंबईत CNGचा मोठा तुटवडा, रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प; मुंबईकरांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता

वडाळ्यातील गेल पाईपलाईन बिघाडामुळे मुंबईत सीएनजी टंचाई मुंबई : वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य

लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला अटक! कोण आहे आमिर रशीद अली?

दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश

केएफसी आणि मॅकडोनाल्डसारखे फूड ब्रॅण्ड रेल्वेस्थानकांवर उघडणार

रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात केला मोठा बदल नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात एक मोठा