Health News : ‘हा’ आजार ठरतोय धोकादायक; जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक अहवाल!

  86

नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या महामारीनंतरही जगाला अजूनही विविध आजारांचा विळखा असल्याचे दिसून येते. अशातच आरोग्य संघटनेने (World Health Organization) एका धोकादायक आजाराचा अहवाल मांडला आहे.


जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, टीबी (क्षयरोग) अत्यंत घातक संसर्गजन्य असा आजार आहे. हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज फैलावू शकतो. त्यामुळे टीबी कोरोना पेक्षा अधिक घातक आजार असल्याचे समोर आले आहे.



भारतात टीबीचे सर्वाधिक रुग्ण


भारतात टीबीचे २६ टक्के रुग्ण आहेत. इंडोनेशिया १० टक्के, चीन ६.८ टक्के, फिलिपिन्स ६.८ टक्के आणि पाकिस्तानात ६.३ टक्के क्षयरोगाचे रुग्ण आहेत. ग्लोबल ट्यूबरकॉलॉसिस रिपोर्ट २०२४ नुसार या आजाराचे जगभरात ५६ टक्के रुग्ण आहेत. जगभरात हा आजार ५५ टक्के पुरुषांत, ३३ टक्के महिलांत तर १२ टक्के लहान मुलांमध्ये आढळून येतो. सन २०२५ पर्यंत भारतातून या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पण सध्याच्या परिस्थितीत भारतातच या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

दरम्यान, सध्या या आजारावर उपचार उपलब्ध असून उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरा होतो. मात्र उपचारास उशीर झाला तर रुग्णाचा मृत्यू होण्याचाही धोका असतो. त्यामुळे टीबीची काहीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांसी संपर्क करावा.



काय आहेत टीबीची लक्षणे


खोकला येणे, खोकल्याबरोबर रक्त येणे, छातीत वेदना होणे, श्वास घेण्यास आणि खाकरण्यास त्रास होणे, ताप, थंडी वाजून येणे, रात्रीच्या वेळेस घाम येणे, वजन कमी होणे, थकवा जाणवणे. क्षयरोगाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे या आजारात सारखा खोकला येत राहतो. तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ हा खोकला येत राहिला तर तुम्ही तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या.

Comments
Add Comment

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या