India vs New Zealand: वानखेडेमध्ये धावांचा पाठलाग सोपा नाही, टीम इंडियाला लावावा लागेल जोर

  46

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. हा सामना रोमहर्षक वळणावर आला आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात ९ बाद १७१ धावा केल्या. एजाज पटेल ७वर नाबाद आहे. न्यूझीलंडकडे १४३ धावांची आघाडी आहे आणि त्यांचा केवळ एक विकेट बाकी आहे.



वानखेडेमध्ये फक्त एकदाच हे घडले


आता तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने एक विकेट लवकर काढला पाहिजे. यानंतर ते आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरतील. सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात २३५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव २६३ धावांवर आटोपला. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारावर भारतीय संघाला २८ धावांची आघाडी मिळाली.


दरम्यान, वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियासाठी चौथ्या डावात पाठलाग करणे सोपे नाही. वानखेडेमध्ये धावांचा पाठलाग करणे कठीण मानले जाते. या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये फक्त एकदा १०० पेक्षा अधिक आव्हान यशस्वीपणे गाठता आले आहे. ही कामगिरी २०००मध्ये दक्षिण आफ्रिकेने केली होती. तेव्हा आफ्रिकेच्या संघाने भारताविरुद्ध १६३ धावांचे आव्हान सहा विकेट गमावत पूर्ण केले होते. म्हणजेच भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी २४ वर्षे जुना रेकॉर्ड मोडावा लागेल.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला