India vs New Zealand: वानखेडेमध्ये धावांचा पाठलाग सोपा नाही, टीम इंडियाला लावावा लागेल जोर

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. हा सामना रोमहर्षक वळणावर आला आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात ९ बाद १७१ धावा केल्या. एजाज पटेल ७वर नाबाद आहे. न्यूझीलंडकडे १४३ धावांची आघाडी आहे आणि त्यांचा केवळ एक विकेट बाकी आहे.



वानखेडेमध्ये फक्त एकदाच हे घडले


आता तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने एक विकेट लवकर काढला पाहिजे. यानंतर ते आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरतील. सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात २३५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव २६३ धावांवर आटोपला. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारावर भारतीय संघाला २८ धावांची आघाडी मिळाली.


दरम्यान, वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियासाठी चौथ्या डावात पाठलाग करणे सोपे नाही. वानखेडेमध्ये धावांचा पाठलाग करणे कठीण मानले जाते. या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये फक्त एकदा १०० पेक्षा अधिक आव्हान यशस्वीपणे गाठता आले आहे. ही कामगिरी २०००मध्ये दक्षिण आफ्रिकेने केली होती. तेव्हा आफ्रिकेच्या संघाने भारताविरुद्ध १६३ धावांचे आव्हान सहा विकेट गमावत पूर्ण केले होते. म्हणजेच भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी २४ वर्षे जुना रेकॉर्ड मोडावा लागेल.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत