India vs New Zealand: वानखेडेमध्ये धावांचा पाठलाग सोपा नाही, टीम इंडियाला लावावा लागेल जोर

  60

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. हा सामना रोमहर्षक वळणावर आला आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात ९ बाद १७१ धावा केल्या. एजाज पटेल ७वर नाबाद आहे. न्यूझीलंडकडे १४३ धावांची आघाडी आहे आणि त्यांचा केवळ एक विकेट बाकी आहे.



वानखेडेमध्ये फक्त एकदाच हे घडले


आता तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने एक विकेट लवकर काढला पाहिजे. यानंतर ते आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरतील. सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात २३५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव २६३ धावांवर आटोपला. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारावर भारतीय संघाला २८ धावांची आघाडी मिळाली.


दरम्यान, वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियासाठी चौथ्या डावात पाठलाग करणे सोपे नाही. वानखेडेमध्ये धावांचा पाठलाग करणे कठीण मानले जाते. या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये फक्त एकदा १०० पेक्षा अधिक आव्हान यशस्वीपणे गाठता आले आहे. ही कामगिरी २०००मध्ये दक्षिण आफ्रिकेने केली होती. तेव्हा आफ्रिकेच्या संघाने भारताविरुद्ध १६३ धावांचे आव्हान सहा विकेट गमावत पूर्ण केले होते. म्हणजेच भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी २४ वर्षे जुना रेकॉर्ड मोडावा लागेल.

Comments
Add Comment

टी-२० वर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने अचानक केली निवृत्तीची घोषणा

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

"१८ वर्षापूर्वीचं का उकरून काढलं?" थप्पड कांड व्हिडिओ लिकने भज्जी संतापला

नवी दिल्ली: ललित मोदी यांनी मायकेल क्लास यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये आयपीएल २००८ च्या हंगामात गाजलेल्या

महिला वर्ल्ड कप खेळणारे संघ होणार करोडपती

दुबई : भारतात ३० सप्टेंबरपासून महिला वनडे विश्वचषक सुरु होत आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेची घोषणा

Asia Cup 2025 : भारताचा सलग दुसऱ्या विजयासह सुपर-४ मध्ये प्रवेश; जपानवर मात

पाटणा : भारतीय संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. रंगतदार लढतीत भारतीय

रोहित शर्मासह ६ क्रिकेटपटूंची सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचणी होणार

बंगळुरु : रोहित शर्मा, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

टी-२० विश्वचषक २०२६ साठी महेंद्रसिंग धोनी पुन्हा टीम इंडियाचा 'मेंटॉर'? बीसीसीआयने दिली ऑफर!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी टीम इंडियाच्या मेंटरपदाची