IND vs NZ : न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताला धक्का!

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमधील पहिले स्थान गमावले


नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मायदेशातील मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टेबलमध्ये भारताची अव्वल स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. मुंबईत खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने भारताचा २५ धावांनी पराभव करत ३-० असा विजय मिळवला. भारतीय संघ १९९९- २००० नंतर प्रथमच कसोटीत स्विप झाला आहे. त्यानंतर संघाचा दक्षिण आफ्रिकेकडून २-० असा पराभव झाला.


किमान तीन सामन्यांच्या मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. डब्लूटीसीच्या चालू चक्रातील भारताचा हा पाचवा पराभव आहे. त्यामुळे त्याच्या गुणांच्या टक्केवारीत (पीसीटी) मोठी घसरण झाली. संघाच्या गुणांची टक्केवारी ६२.८२ वरून ५८.३३ वर घसरली. भारत अशा प्रकारे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या मागे दुसऱ्या स्थानावर घसरला आहे, ज्याने ६२. ५० च्या पीसीटीसह अव्वल स्थान पटकावले आहे. पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी भारताला आता ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचे आहे. या मालिकेचे महत्त्व आता वाढले आहे कारण दोन्ही संघांमध्ये अव्वल दोन स्थानांसाठी स्पर्धा होणार आहे. न्यूझीलंड मालिकेपूर्वी, भारत सलग तिसऱ्यांदा डब्लूटीसी फायनल खेळण्याचा सर्वात मोठा दावेदार मानला जात होता.

दरम्यान, न्यूझीलंडच्या भारतातील ऐतिहासिक मालिका विजयामुळे त्यांच्या डब्लूटीसी अंतिम आकांक्षा बळकट झाल्या आहेत. न्यूझीलंड ५४. ५५ च्या पीसीटीसह चौथ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका ५५.५६ च्या पीसीटीसह तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका ५४.१७ च्या पीसीटीसह पाचव्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी