Jobs: कर्जामध्ये बुडत चाललेत भारतातील नोकरपेशा लोक

मुंबई: भारतातील नोकरीपेक्षा वर्ग आधीच्या तुलनेत अधिक कर्जामध्ये बुडत चालला आहे. गेल्या दोन वर्षात कर्ज घेणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आङे. एका सर्व्हे रिपोर्टनुसार नोकरी करोणाऱ्या लोकांवर २५ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. मेट्रो शहरांमध्ये कर्जाशिवाय जगणारी लोकांची संख्या खूपच कमी आहे. नोकरी करणाऱ्या महिलांवर अधिकतर घरासाठीचे कर्ज आहे.



केवळ १३.४ टक्के लोक कर्जाशिवाय जगत आहेत


एका सर्वेक्षणानुसार नोकरी करणाऱ्यांमध्ये केवळ १३.४ टक्के लोकच कर्जाशिवाय जगत आहेत. २०२२मध्ये ही संख्या १९ टक्के होती. गेल्या दोन वर्षात ही संख्या मोठी वाढली आहे. नोकरी करणाऱ्यांनी २५ लाखांपर्यंतचे लोन सर्वाधिक घेतले आहेत. अशातच कर्ज घेणाऱ्यांची संख्या आता ९१.२ टक्के झाली आहे.


गेल्या वर्षीपर्यंत हा आकडा ८८ टक्के होता. या सर्वेक्षणात २२ ते ४५ वर्षाच्या १५२९ लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्व्हेमध्ये ६ मेट्रो शहरे आणि १८ टियर २ शहराच्या लोकांना सामील करण्यात आले होते. यात ४० टक्के महिला होत्या. यातील सर्वांचा पगार कमीत कमी ३० हजार रूपये होता.



घर-कारशिवाय आंतरराष्ट्रीय सहलींवर केला जातोय खर्च


सर्वेनुसार कर्ज आणि क्रेडिट कार्डचा वापर सर्वाधिक नोकरी करणारे लोक करत आहेत. यांना डिजीटल ट्रान्झॅक्शनची चांगली माहिती असते. सोबतच ऑनलाईन खरेदीही करतात. कामाच्या ठिकाणी २२ ते २७ वयोगटातील युवा मंडळी टेक्नॉलॉजीची चांगली माहिती ठेवतात. यानंतर २८ ते ३४ वर्षांचे लोक असतात जे घर आणि कार खरेदीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासावरही खर्च करतात.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, तपास यंत्रणा सतर्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना जीवे

Gujarat ATS : गुजरात एटीएसकडून जैश-ए-मोहम्मदच्या संशयित मॉड्यूलचा पर्दाफाश , ८ आरोपी अटकेत

अहमदाबाद : गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अनेक राज्यांमध्ये संयुक्त कारवाई करत, बंदी घातलेल्या

Waterfall Trip : धबधब्याखाली भिजायचंय? मग हे 5 वॉटरप्रूफ गॅझेट्स नक्की सोबत ठेवा

वॉटरफॉल ट्रिपची तयारी झाली? धबधब्याखाली (Waterfall) मनसोक्त भिजण्याचा आनंद घ्या, पण तुमचा फोन, गॅझेट्स (Gadgets) आणि

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या