Jobs: कर्जामध्ये बुडत चाललेत भारतातील नोकरपेशा लोक

मुंबई: भारतातील नोकरीपेक्षा वर्ग आधीच्या तुलनेत अधिक कर्जामध्ये बुडत चालला आहे. गेल्या दोन वर्षात कर्ज घेणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आङे. एका सर्व्हे रिपोर्टनुसार नोकरी करोणाऱ्या लोकांवर २५ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. मेट्रो शहरांमध्ये कर्जाशिवाय जगणारी लोकांची संख्या खूपच कमी आहे. नोकरी करणाऱ्या महिलांवर अधिकतर घरासाठीचे कर्ज आहे.



केवळ १३.४ टक्के लोक कर्जाशिवाय जगत आहेत


एका सर्वेक्षणानुसार नोकरी करणाऱ्यांमध्ये केवळ १३.४ टक्के लोकच कर्जाशिवाय जगत आहेत. २०२२मध्ये ही संख्या १९ टक्के होती. गेल्या दोन वर्षात ही संख्या मोठी वाढली आहे. नोकरी करणाऱ्यांनी २५ लाखांपर्यंतचे लोन सर्वाधिक घेतले आहेत. अशातच कर्ज घेणाऱ्यांची संख्या आता ९१.२ टक्के झाली आहे.


गेल्या वर्षीपर्यंत हा आकडा ८८ टक्के होता. या सर्वेक्षणात २२ ते ४५ वर्षाच्या १५२९ लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्व्हेमध्ये ६ मेट्रो शहरे आणि १८ टियर २ शहराच्या लोकांना सामील करण्यात आले होते. यात ४० टक्के महिला होत्या. यातील सर्वांचा पगार कमीत कमी ३० हजार रूपये होता.



घर-कारशिवाय आंतरराष्ट्रीय सहलींवर केला जातोय खर्च


सर्वेनुसार कर्ज आणि क्रेडिट कार्डचा वापर सर्वाधिक नोकरी करणारे लोक करत आहेत. यांना डिजीटल ट्रान्झॅक्शनची चांगली माहिती असते. सोबतच ऑनलाईन खरेदीही करतात. कामाच्या ठिकाणी २२ ते २७ वयोगटातील युवा मंडळी टेक्नॉलॉजीची चांगली माहिती ठेवतात. यानंतर २८ ते ३४ वर्षांचे लोक असतात जे घर आणि कार खरेदीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासावरही खर्च करतात.

Comments
Add Comment

करिष्माच्या मुलांनाही हवाय हिस्सा; संजय कपूरच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा वाद आता कोर्टात

नवी दिल्ली : प्रिया कपूरने संजय कपूर यांचे मृत्युपत्र नसल्याचा दावा केल्याचा आरोप मुलांनी केला आहे. त्यावेळी

उपराष्ट्रपती निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांचा दणदणीत विजय; विरोधकांची मते फुटली?

नवी दिल्ली: भारताला नवे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन मिळाले आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे

शिक्षक भरतीवेळी महाविद्यालयाच्या आवारात दिसले महाकाय अजगर

अलवर : राजस्थानमधील अलवर येथे अनुदानीत वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होती. ही

२०४० मध्ये चंद्रावर भारतीय पाऊल पडणार

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांचा विश्वास नवी दिल्ली : इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी चांद्रयान ४,

सियाचीनमध्ये भीषण हिमस्खलन : तीन भारतीय जवान शहीद !

नवी दिल्ली : लडाखमधील सियाचीन बेस कॅम्पवर झालेल्या हिमस्खलनात तीन भारतीय लष्करी जवान शाहिद झाले आहेत . बचाव

Heavy Rains Hit Punjab : पाऊस-पूर-भूस्खलनाची तिहेरी संकटे; भूस्खलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प, २३ गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश,