Jobs: कर्जामध्ये बुडत चाललेत भारतातील नोकरपेशा लोक

मुंबई: भारतातील नोकरीपेक्षा वर्ग आधीच्या तुलनेत अधिक कर्जामध्ये बुडत चालला आहे. गेल्या दोन वर्षात कर्ज घेणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आङे. एका सर्व्हे रिपोर्टनुसार नोकरी करोणाऱ्या लोकांवर २५ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. मेट्रो शहरांमध्ये कर्जाशिवाय जगणारी लोकांची संख्या खूपच कमी आहे. नोकरी करणाऱ्या महिलांवर अधिकतर घरासाठीचे कर्ज आहे.



केवळ १३.४ टक्के लोक कर्जाशिवाय जगत आहेत


एका सर्वेक्षणानुसार नोकरी करणाऱ्यांमध्ये केवळ १३.४ टक्के लोकच कर्जाशिवाय जगत आहेत. २०२२मध्ये ही संख्या १९ टक्के होती. गेल्या दोन वर्षात ही संख्या मोठी वाढली आहे. नोकरी करणाऱ्यांनी २५ लाखांपर्यंतचे लोन सर्वाधिक घेतले आहेत. अशातच कर्ज घेणाऱ्यांची संख्या आता ९१.२ टक्के झाली आहे.


गेल्या वर्षीपर्यंत हा आकडा ८८ टक्के होता. या सर्वेक्षणात २२ ते ४५ वर्षाच्या १५२९ लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्व्हेमध्ये ६ मेट्रो शहरे आणि १८ टियर २ शहराच्या लोकांना सामील करण्यात आले होते. यात ४० टक्के महिला होत्या. यातील सर्वांचा पगार कमीत कमी ३० हजार रूपये होता.



घर-कारशिवाय आंतरराष्ट्रीय सहलींवर केला जातोय खर्च


सर्वेनुसार कर्ज आणि क्रेडिट कार्डचा वापर सर्वाधिक नोकरी करणारे लोक करत आहेत. यांना डिजीटल ट्रान्झॅक्शनची चांगली माहिती असते. सोबतच ऑनलाईन खरेदीही करतात. कामाच्या ठिकाणी २२ ते २७ वयोगटातील युवा मंडळी टेक्नॉलॉजीची चांगली माहिती ठेवतात. यानंतर २८ ते ३४ वर्षांचे लोक असतात जे घर आणि कार खरेदीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासावरही खर्च करतात.

Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन