Jobs: कर्जामध्ये बुडत चाललेत भारतातील नोकरपेशा लोक

मुंबई: भारतातील नोकरीपेक्षा वर्ग आधीच्या तुलनेत अधिक कर्जामध्ये बुडत चालला आहे. गेल्या दोन वर्षात कर्ज घेणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आङे. एका सर्व्हे रिपोर्टनुसार नोकरी करोणाऱ्या लोकांवर २५ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. मेट्रो शहरांमध्ये कर्जाशिवाय जगणारी लोकांची संख्या खूपच कमी आहे. नोकरी करणाऱ्या महिलांवर अधिकतर घरासाठीचे कर्ज आहे.



केवळ १३.४ टक्के लोक कर्जाशिवाय जगत आहेत


एका सर्वेक्षणानुसार नोकरी करणाऱ्यांमध्ये केवळ १३.४ टक्के लोकच कर्जाशिवाय जगत आहेत. २०२२मध्ये ही संख्या १९ टक्के होती. गेल्या दोन वर्षात ही संख्या मोठी वाढली आहे. नोकरी करणाऱ्यांनी २५ लाखांपर्यंतचे लोन सर्वाधिक घेतले आहेत. अशातच कर्ज घेणाऱ्यांची संख्या आता ९१.२ टक्के झाली आहे.


गेल्या वर्षीपर्यंत हा आकडा ८८ टक्के होता. या सर्वेक्षणात २२ ते ४५ वर्षाच्या १५२९ लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्व्हेमध्ये ६ मेट्रो शहरे आणि १८ टियर २ शहराच्या लोकांना सामील करण्यात आले होते. यात ४० टक्के महिला होत्या. यातील सर्वांचा पगार कमीत कमी ३० हजार रूपये होता.



घर-कारशिवाय आंतरराष्ट्रीय सहलींवर केला जातोय खर्च


सर्वेनुसार कर्ज आणि क्रेडिट कार्डचा वापर सर्वाधिक नोकरी करणारे लोक करत आहेत. यांना डिजीटल ट्रान्झॅक्शनची चांगली माहिती असते. सोबतच ऑनलाईन खरेदीही करतात. कामाच्या ठिकाणी २२ ते २७ वयोगटातील युवा मंडळी टेक्नॉलॉजीची चांगली माहिती ठेवतात. यानंतर २८ ते ३४ वर्षांचे लोक असतात जे घर आणि कार खरेदीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासावरही खर्च करतात.

Comments
Add Comment

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि