Jobs: कर्जामध्ये बुडत चाललेत भारतातील नोकरपेशा लोक

मुंबई: भारतातील नोकरीपेक्षा वर्ग आधीच्या तुलनेत अधिक कर्जामध्ये बुडत चालला आहे. गेल्या दोन वर्षात कर्ज घेणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आङे. एका सर्व्हे रिपोर्टनुसार नोकरी करोणाऱ्या लोकांवर २५ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. मेट्रो शहरांमध्ये कर्जाशिवाय जगणारी लोकांची संख्या खूपच कमी आहे. नोकरी करणाऱ्या महिलांवर अधिकतर घरासाठीचे कर्ज आहे.



केवळ १३.४ टक्के लोक कर्जाशिवाय जगत आहेत


एका सर्वेक्षणानुसार नोकरी करणाऱ्यांमध्ये केवळ १३.४ टक्के लोकच कर्जाशिवाय जगत आहेत. २०२२मध्ये ही संख्या १९ टक्के होती. गेल्या दोन वर्षात ही संख्या मोठी वाढली आहे. नोकरी करणाऱ्यांनी २५ लाखांपर्यंतचे लोन सर्वाधिक घेतले आहेत. अशातच कर्ज घेणाऱ्यांची संख्या आता ९१.२ टक्के झाली आहे.


गेल्या वर्षीपर्यंत हा आकडा ८८ टक्के होता. या सर्वेक्षणात २२ ते ४५ वर्षाच्या १५२९ लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्व्हेमध्ये ६ मेट्रो शहरे आणि १८ टियर २ शहराच्या लोकांना सामील करण्यात आले होते. यात ४० टक्के महिला होत्या. यातील सर्वांचा पगार कमीत कमी ३० हजार रूपये होता.



घर-कारशिवाय आंतरराष्ट्रीय सहलींवर केला जातोय खर्च


सर्वेनुसार कर्ज आणि क्रेडिट कार्डचा वापर सर्वाधिक नोकरी करणारे लोक करत आहेत. यांना डिजीटल ट्रान्झॅक्शनची चांगली माहिती असते. सोबतच ऑनलाईन खरेदीही करतात. कामाच्या ठिकाणी २२ ते २७ वयोगटातील युवा मंडळी टेक्नॉलॉजीची चांगली माहिती ठेवतात. यानंतर २८ ते ३४ वर्षांचे लोक असतात जे घर आणि कार खरेदीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासावरही खर्च करतात.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी