IND Vs NZ: मुंबईत १२ वर्षांपासून अजेय आहे टीम इंडिया

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ आपल्या घरात न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. सुरूवातीचे दोन सामने जिंकत न्यूझीलंडच्या संघाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना एक नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.


न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदा एखादी कसोटी मालिका जिंकली आहे. मात्र आता शेवटचा कसोटी सामना जिंकत भारत शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल. हे शक्यही होऊ शकते कारण वानखेडेमध्ये भारतीय संघाचा कसोटी रेकॉर्ड शानदार आहे.



गेल्यावेळेस वानखेडेमध्ये न्यूझीलंडला हरवले होते


भारतीय संघ या मैदानावर गेल्या १२ वर्षात एकही कसोटी सामना हरलेला नाही. या मैदानावर शेवटचा कसोटी सामना न्यूझीलंडविरुद्ध डिसेंबर २०२१मध्ये झाला होता. हा सामना भारताने ३७२ धावांच्या अंतराने जिंकला होता. न्यूझीलंडचा संघ हा पराभव विसरलेले नसणार.


वानखेडेमध्ये भारतीय संघाने शेवटी नोव्हेंबर २०१२मध्ये पराभव स्वीकारला होता. तेव्हा इंग्लंडने १० विकेटने हरवले होते. यानंतर भारतीय संघाने या मैदानावर तीन कसोटी सामने खेळले आणि तीनही जिंकले. यामध्ये अनुक्रमे वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि न्यूझीलंडला हरवले.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून