IND Vs NZ: मुंबईत १२ वर्षांपासून अजेय आहे टीम इंडिया

  201

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ आपल्या घरात न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. सुरूवातीचे दोन सामने जिंकत न्यूझीलंडच्या संघाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना एक नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.


न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदा एखादी कसोटी मालिका जिंकली आहे. मात्र आता शेवटचा कसोटी सामना जिंकत भारत शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल. हे शक्यही होऊ शकते कारण वानखेडेमध्ये भारतीय संघाचा कसोटी रेकॉर्ड शानदार आहे.



गेल्यावेळेस वानखेडेमध्ये न्यूझीलंडला हरवले होते


भारतीय संघ या मैदानावर गेल्या १२ वर्षात एकही कसोटी सामना हरलेला नाही. या मैदानावर शेवटचा कसोटी सामना न्यूझीलंडविरुद्ध डिसेंबर २०२१मध्ये झाला होता. हा सामना भारताने ३७२ धावांच्या अंतराने जिंकला होता. न्यूझीलंडचा संघ हा पराभव विसरलेले नसणार.


वानखेडेमध्ये भारतीय संघाने शेवटी नोव्हेंबर २०१२मध्ये पराभव स्वीकारला होता. तेव्हा इंग्लंडने १० विकेटने हरवले होते. यानंतर भारतीय संघाने या मैदानावर तीन कसोटी सामने खेळले आणि तीनही जिंकले. यामध्ये अनुक्रमे वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि न्यूझीलंडला हरवले.

Comments
Add Comment

"१८ वर्षापूर्वीचं का उकरून काढलं?" थप्पड कांड व्हिडिओ लिकने भज्जी संतापला

नवी दिल्ली: ललित मोदी यांनी मायकेल क्लास यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये आयपीएल २००८ च्या हंगामात गाजलेल्या

महिला वर्ल्ड कप खेळणारे संघ होणार करोडपती

दुबई : भारतात ३० सप्टेंबरपासून महिला वनडे विश्वचषक सुरु होत आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेची घोषणा

Asia Cup 2025 : भारताचा सलग दुसऱ्या विजयासह सुपर-४ मध्ये प्रवेश; जपानवर मात

पाटणा : भारतीय संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. रंगतदार लढतीत भारतीय

रोहित शर्मासह ६ क्रिकेटपटूंची सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचणी होणार

बंगळुरु : रोहित शर्मा, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

टी-२० विश्वचषक २०२६ साठी महेंद्रसिंग धोनी पुन्हा टीम इंडियाचा 'मेंटॉर'? बीसीसीआयने दिली ऑफर!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी टीम इंडियाच्या मेंटरपदाची

Asia Cup 2025 च्या सामन्यांच्या वेळेत बदल! भारत-पाकिस्तान सामना आता कधी सुरू होणार?

नवी दिल्ली: आगामी आशिया कप २०२५ सुरू होण्याआधीच क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेतील