IND Vs NZ: मुंबईत १२ वर्षांपासून अजेय आहे टीम इंडिया

  194

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ आपल्या घरात न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. सुरूवातीचे दोन सामने जिंकत न्यूझीलंडच्या संघाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना एक नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.


न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदा एखादी कसोटी मालिका जिंकली आहे. मात्र आता शेवटचा कसोटी सामना जिंकत भारत शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल. हे शक्यही होऊ शकते कारण वानखेडेमध्ये भारतीय संघाचा कसोटी रेकॉर्ड शानदार आहे.



गेल्यावेळेस वानखेडेमध्ये न्यूझीलंडला हरवले होते


भारतीय संघ या मैदानावर गेल्या १२ वर्षात एकही कसोटी सामना हरलेला नाही. या मैदानावर शेवटचा कसोटी सामना न्यूझीलंडविरुद्ध डिसेंबर २०२१मध्ये झाला होता. हा सामना भारताने ३७२ धावांच्या अंतराने जिंकला होता. न्यूझीलंडचा संघ हा पराभव विसरलेले नसणार.


वानखेडेमध्ये भारतीय संघाने शेवटी नोव्हेंबर २०१२मध्ये पराभव स्वीकारला होता. तेव्हा इंग्लंडने १० विकेटने हरवले होते. यानंतर भारतीय संघाने या मैदानावर तीन कसोटी सामने खेळले आणि तीनही जिंकले. यामध्ये अनुक्रमे वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि न्यूझीलंडला हरवले.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार