Western Railway : ट्रेनमधून अधिक वजनाचे सामान नेल्यास होणार कारवाई!

पश्चिम रेल्वेने घेतला निर्णय


मुंबई : लोकलमधून (Local Train) प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे रेल्वे डब्यांच्या श्रेणीनुसार ३५ ते ७० किलो सामान प्रवासी डब्यातून नेण्यास परवानगी दिली आहे. मात्र याचा कित्येकजण गैरफायदा घेत ७० किलोहून अधिक वजनाचे सामान (Overweight luggage) घेऊन प्रवास करतात. याची अडचण इतर प्रवाशांना होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याबाबत कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.


पश्चिम रेल्वेने (Western Railway) लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जास्त वजन घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांनुसार १००×१००×७० सेमीपेक्षा अधिक आकाराचे आणि ७५ किलोपेक्षा अधिक वजनाचे सामान प्रवासी डब्यातून नेताना आढळल्यास प्रवाशांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


वांद्रे टर्मिनसमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर रेल्वे स्थानकातील गर्दी नियोजनासाठी पश्चिम रेल्वेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे नियमापेक्षा जास्त वजनाचे आणि आकाराच्या सामानांसाठी मेल-एक्स्प्रेसच्या मालडब्यांची सुविधा आहे. प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या