न्यूझीलंडविरुद्ध कहर करण्यासाठी येतोय हा क्रिकेटर...भारतीय संघात सरप्राईज एंट्री!

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला बोलावले आहे. त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात निवडण्यात आले होते.


मात्र आता न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या कसोटीसाठी त्याला सामील करण्यात आले आहे. हर्षितला या मालिकेच्या पहिल्या कसोटीत ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून ठेवण्यात आले होते. त्यानंतर रिलीज करण्यात आले होते. यानंतर हर्षितने रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीसाठी खेळताना आसामविरुद्ध पहिल्या डावात ५ विकेट घेतल्या. सोबतच अर्धशतकही ठोकले होते.


मिळालेल्या माहितीनुसार हर्षित मुंबई कसोटीत पदार्पण करू शकतो. भारतीय संघाने याच पद्धतीने दुसऱ्या कसोटीसाठी ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरला बोलावले होते. हर्षितला आयपीएल २०२४मधील जबरदस्त कामगिरीनंतर भारतीय संघात निवडण्यात आले. त्याआधी तो झिम्बाब्वे दौऱ्यावर टी-२० संघासोबत गेला होता. श्रीलंका दौऱ्यावर तो वनडे संघाचा भाग होता.


नुकतेच बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेतही त्याची निवड झाली होती. मात्र अद्याप त्याने पदार्पण केले नव्हते. आता असे वाटत आहे की कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून खाते खोलेल. भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाशदीप आधीपासूनच आहेत. तिसऱ्या कसोटीत बुमराहसोबत दुसरा वेगवान गोलंदाज हर्षितला उतरवले जाऊ शकते.


भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड २-० ने आघाडीवर आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना एक नोव्हेंबरासून वानखेडेवर खेळवला जाणार आहे.


Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून