न्यूझीलंडविरुद्ध कहर करण्यासाठी येतोय हा क्रिकेटर...भारतीय संघात सरप्राईज एंट्री!

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला बोलावले आहे. त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात निवडण्यात आले होते.


मात्र आता न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या कसोटीसाठी त्याला सामील करण्यात आले आहे. हर्षितला या मालिकेच्या पहिल्या कसोटीत ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून ठेवण्यात आले होते. त्यानंतर रिलीज करण्यात आले होते. यानंतर हर्षितने रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीसाठी खेळताना आसामविरुद्ध पहिल्या डावात ५ विकेट घेतल्या. सोबतच अर्धशतकही ठोकले होते.


मिळालेल्या माहितीनुसार हर्षित मुंबई कसोटीत पदार्पण करू शकतो. भारतीय संघाने याच पद्धतीने दुसऱ्या कसोटीसाठी ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरला बोलावले होते. हर्षितला आयपीएल २०२४मधील जबरदस्त कामगिरीनंतर भारतीय संघात निवडण्यात आले. त्याआधी तो झिम्बाब्वे दौऱ्यावर टी-२० संघासोबत गेला होता. श्रीलंका दौऱ्यावर तो वनडे संघाचा भाग होता.


नुकतेच बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेतही त्याची निवड झाली होती. मात्र अद्याप त्याने पदार्पण केले नव्हते. आता असे वाटत आहे की कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून खाते खोलेल. भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाशदीप आधीपासूनच आहेत. तिसऱ्या कसोटीत बुमराहसोबत दुसरा वेगवान गोलंदाज हर्षितला उतरवले जाऊ शकते.


भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड २-० ने आघाडीवर आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना एक नोव्हेंबरासून वानखेडेवर खेळवला जाणार आहे.


Comments
Add Comment

पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या

आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने मांडला आशिया कपचा मुद्दा, समस्येवर मार्ग काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई

ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.