AIMIM कडून वारिस पठाण निवडणुकीच्या रिंगणात, या जागेवरून लढवणार निवडणूक

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमद्ये असदुद्दीन औवेसी यांचा पक्ष AIMIM ने भिवंडी पश्चिम येथून आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. वारिस पठाण यांना भिवंडीतून तिकीट देण्यात आले आहे. मलकपेट येथून आमदार अहमद बिन अब्दुल्लाह बलालाने वारिस यांना बी फॉर्म दिला.


AIMIM ने एक्सवर पोस्ट शेअर करताना लिहिले, AIMIM ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून वारिस पठाण यांना उमेदवार निवडले आहे. AIMIM मलकपेटचे आमदार आणि मुंबई प्रभारी अहमद बिन अब्दुल्लाह बलाला यांनी वारिस पठाण यांना बी फॉर्म दिला.


वारिस पठाण यांनी रविवारी उमेदवारांच्या घोषणेबाबत म्हटले होते, मी पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करतो आणि मी खूप खुश आहे की विचारपूर्वक उमेदवार निवडण्यात आलेत. मला आशा आहे की आम्ही निवडणूक जिंकू. वारिस पठाण यांनी सांगितले होते की सोमवारी इतर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल. सोमवारी जेव्हा उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली तेव्हा त्यांचेही नाव घोषित करण्यात आले. वारिस पठाण मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.


राज्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आङे. अशातच राजकीय पक्ष उरलेल्या जागांवर उमेदवार जाहीर करत आहेत. यातच एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Comments
Add Comment

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा

विभागातील नागरी कामांसोबतच सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य इमारतींची जबाबदारी

रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश रुग्णालयांमधील कामांवर सहायक

पीपीपी धोरणांतर्गत वाटप केलेल्या ५ शाळांच्या भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करा

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र मुंबई : शाळांसाठी राखीव असलेले

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती