Census To Start In 2025 : आता जनगणनेचे चक्र बदलणार, २०२५ पासून सुरु होणार जनगणना

Share

आता देशात जनगणनेस सुरुवात होणार आहे. मात्र जनगणनेचे चक्र बदलणार आहे. नेहमी दहा वर्षांनी होणारी जनगणना यंदा १४ वर्षांनी होणार आहे. जनगणना २०११ नंतर आता २०२५ मध्ये होणार असून त्यानंतर २०३५, २०४५, २०५५ अशी पुन्हा दहा, दहा वर्षांनी जनगणना होणार आहे. यापूर्वी १९९१, २००१, २०११ अशी जनगणना झाली होती. आता २०२५ मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये संप्रदायाची माहिती घेतली जाणार आहे. २०२५ मध्ये सुरु होणार जनगणना २०२६ पर्यंत चालू राहणार आहे. कोरोनामुळे २०२१ मध्ये जनगणना झाली नव्हती. परंतु या जनगणनेत जातीय जनगणना होणार का? यासंदर्भात कोणताही खुलासा अजून झालेला नाही.

जातीय जनगणनेची अनेक विरोधी पक्षांकडून मागणी होत आहे. सरकारने मात्र याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. धर्म आणि वर्ग जनगणनेत विचारले जातात. सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते. लोकांना या वेळी ते कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत हे देखील विचारले जाऊ शकते.

आतापर्यंत जनगणनेत धर्म आणि वर्ग विचारला जात होता. सामन्यपणे अनुसूचित जाती आणि जनजातीची गणना केली जात होती. मात्र यंदा संप्रदाय विचारला जाणार आहे. कर्नाटकात जसे सामान्य वर्गात असलेले लिंगायत समाज स्वत: वेगळा संप्रदाय मानतात. तसेच अनुसूचित जातीत वाल्मीकी, रविदासी सारखा संप्रदाय आहे. म्हणजेच आता धर्म, वर्ग सोबत संप्रदाय गणनेचा आधार असणार आहे. सरकारचा त्याबाबत विचार सुरु आहे.

जातीय जनगणना होणार का?

जनगणना पूर्ण झाल्यानंतर २०२६ मध्ये लोकसभेच्या जागांचे सीमांकन सुरू होणार आहे. त्यानंतर हे काम २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष आणि एनडीएमधील काही पक्षांनी जातीय जनगणनेची मागणीसुद्धा केली आहे. मात्र केंद्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही.

जनगणनेचा इतिहास

१८७२ मध्ये भारतातील पहिली जनगणना गव्हर्नर-जनरल लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली होती. १८८१ मध्ये भारताची पहिली संपूर्ण जनगणना आयुक्त डब्ल्यू.सी. प्लॉडेन यांनी केली होती. त्यानंतर हे दर १० वर्षांनी एकदा जनगणना होत आली. मात्र, त्यातही काही वेळा अंतर दिसून आले.

१८७२
१८८१
१८९१
१९०१
१९११
१९२१
१९३१
१९४१

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५१ मध्ये पहिली जनगणना झाली.

१९५१
१९६१
१९७१
१९९१
२००१
२०११

Recent Posts

UPSC CSE Result : ‘यूपीएससी’चा निकाल जाहीर! महाराष्ट्राचा अर्चित डोंगरेने मारली बाजी

नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…

28 minutes ago

लँड स्कॅमचा बादशाह उद्धव! आशिष शेलारांचा थेट घणाघात

मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…

29 minutes ago

Heart Attack: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ का झाली आहे? अभ्यासात मोठा खुलासा

कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…

1 hour ago

Pune News : पुण्यात रोड रेजचा धक्कादायक प्रकार; हॉर्न वाजवला म्हणून जोडप्याला मारहाण

पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…

1 hour ago

Devmanus 3 : ‘या माप घेतो म्हणत’ देवमाणूस परत आला! पहा थरारक प्रोमो

मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…

2 hours ago

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

3 hours ago