Census To Start In 2025 : आता जनगणनेचे चक्र बदलणार, २०२५ पासून सुरु होणार जनगणना

  152

आता देशात जनगणनेस सुरुवात होणार आहे. मात्र जनगणनेचे चक्र बदलणार आहे. नेहमी दहा वर्षांनी होणारी जनगणना यंदा १४ वर्षांनी होणार आहे. जनगणना २०११ नंतर आता २०२५ मध्ये होणार असून त्यानंतर २०३५, २०४५, २०५५ अशी पुन्हा दहा, दहा वर्षांनी जनगणना होणार आहे. यापूर्वी १९९१, २००१, २०११ अशी जनगणना झाली होती. आता २०२५ मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये संप्रदायाची माहिती घेतली जाणार आहे. २०२५ मध्ये सुरु होणार जनगणना २०२६ पर्यंत चालू राहणार आहे. कोरोनामुळे २०२१ मध्ये जनगणना झाली नव्हती. परंतु या जनगणनेत जातीय जनगणना होणार का? यासंदर्भात कोणताही खुलासा अजून झालेला नाही.


जातीय जनगणनेची अनेक विरोधी पक्षांकडून मागणी होत आहे. सरकारने मात्र याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. धर्म आणि वर्ग जनगणनेत विचारले जातात. सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते. लोकांना या वेळी ते कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत हे देखील विचारले जाऊ शकते.


आतापर्यंत जनगणनेत धर्म आणि वर्ग विचारला जात होता. सामन्यपणे अनुसूचित जाती आणि जनजातीची गणना केली जात होती. मात्र यंदा संप्रदाय विचारला जाणार आहे. कर्नाटकात जसे सामान्य वर्गात असलेले लिंगायत समाज स्वत: वेगळा संप्रदाय मानतात. तसेच अनुसूचित जातीत वाल्मीकी, रविदासी सारखा संप्रदाय आहे. म्हणजेच आता धर्म, वर्ग सोबत संप्रदाय गणनेचा आधार असणार आहे. सरकारचा त्याबाबत विचार सुरु आहे.





जातीय जनगणना होणार का?


जनगणना पूर्ण झाल्यानंतर २०२६ मध्ये लोकसभेच्या जागांचे सीमांकन सुरू होणार आहे. त्यानंतर हे काम २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष आणि एनडीएमधील काही पक्षांनी जातीय जनगणनेची मागणीसुद्धा केली आहे. मात्र केंद्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही.



जनगणनेचा इतिहास


१८७२ मध्ये भारतातील पहिली जनगणना गव्हर्नर-जनरल लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली होती. १८८१ मध्ये भारताची पहिली संपूर्ण जनगणना आयुक्त डब्ल्यू.सी. प्लॉडेन यांनी केली होती. त्यानंतर हे दर १० वर्षांनी एकदा जनगणना होत आली. मात्र, त्यातही काही वेळा अंतर दिसून आले.


१८७२
१८८१
१८९१
१९०१
१९११
१९२१
१९३१
१९४१



देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५१ मध्ये पहिली जनगणना झाली.


१९५१
१९६१
१९७१
१९९१
२००१
२०११

Comments
Add Comment

Terrorist hideout destroyed: पुंछमध्ये दहशतवादी अड्डा नष्ट, शस्त्रसामुग्री जप्त

सुरनकोट जंगलात लष्कर-पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शस्त्रसाठा सापडला; किश्तवाडमध्ये स्वतंत्र दहशतवादविरोधी

Bihar polls: सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो; 'हा महिलांचा अपमान' महिलांची टीका

पाटणा : बिहार काँग्रेसने "प्रियदर्शिनी उड्डाण योजना" अंतर्गत पाच लाख सॅनिटरी पॅड बॉक्स वाटप करण्याची घोषणा केली

शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू

बाराबंकी : शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशमधील

PM Modi Award List : ११ वर्षांत २५ पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदींचा सन्मान; पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाना या देशाने त्यांचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. मोदी

अमरनाथ यात्रा मार्गावर भीषण अपघात: ५ बस एकमेकांवर आदळल्या, ३६ यात्रेकरू जखमी!

जम्मू: अमरनाथ यात्रेला निघालेल्या भाविकांवर आज दुर्दैवी प्रसंग ओढवला. जम्मू आणि काश्मीरमधील रामबन

Grand Chess Tour 2025 : गुकेशची कमाल! कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं अन् गुकेशनं त्याच्याचं नाकावर टिच्चून 'रॅपिड' स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं

नवी दिल्ली : क्रोएशियातील झाग्रेब येथे झालेल्या ग्रँड चेस टूर २०२५ रॅपिड अँड ब्लिट्झमध्ये विद्यमान विश्वविजेता