महायुतीच्या 'त्या' निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

लढणार की, हटणार?


मुंबई: मुंबईत माहीम विधानसभेत तिहेरी लढत होणार असल्याचं समोर आलं होतं. माहीममध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. (Amit Thackeray) तर, शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येथे मोठा ट्वीस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमित ठाकरेंसाठी महायुती आणि मनसे यांच्याकडून वाटाघाटी सुरू असल्याची चर्चा आहे. विद्यमान आमदार सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं बोललं जातय.



कोण लढणार , कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार ?


माहीममधून अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे. पण, असं झाल्यास खरा फायदा ठाकरे गटाच्या उमेदवाराला होऊ शकतो, असं बोललं जात आहे. त्यामुळे अमित ठाकरेंचं विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातलं आव्हान कमी करण्यासाठी महायुती आणि मनसेकडून प्रयत्न सुरू आहेत. मंत्री दीपक केसरकर एक खास निरोप घेऊन राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेल्याची माहिती समोर आली. तर, दुसरीकडे आशिष शेलार यांनी अमित ठाकरेंना महायुतीनं समर्थन दिलं पाहिजे, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं बोललं जात आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.