यंदाच्या निवडणुकीत अपक्ष ठरणार गेमचेंजर

अल्पेश म्हात्रे


मुंबई : यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने निवडणुकीत काय होईल ते अजूनही सांगता येणे कठीण आहे . मोठमोठ्या पक्षाची झालेली शकले व त्यातून निर्माण झालेल्या अधिक संधी मात्र तरीही बंडखोरांची  चिंता ही सर्वच पक्षांना जाणवू लागली आहे.त्यामुळे जर बंडखोरांमुळे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले तर अपक्ष म्हणून लढणारे बंडखोरांना प्रचंड महत्व प्राप्त होऊ शकेल.


जर मंगळवार ४ नोव्हेंबरपर्यंत तिकीट माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत जर या बंडखोरांना थोपवण्यात अपयश आले  नाही, तर मात्र सर्वच पक्षांना या बंडखोरांचा ताप निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन होईल किंवा दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. १९९५ साली महाराष्ट्राच्या राजकारणात अशाच पद्धतीने बंडखोरी होऊन मोठ्या प्रमाणात अपक्ष निवडून आले होते. त्यामुळे १९९५ ची पुनरावृत्ती आता होईल का? की, सुजाण नागरिक मतदान करताना योग्य उमेदवार निवडून देतील हे येणारा काळच ठरवेल.


यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे फुटून दोन शिवसेना झाल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुटून दोन पक्ष निर्माण झाले आहेत. त्यामुळे सहा ते सात मोठे मोठे पक्ष ही निवडणूक लढवत आहे. पक्षांची संख्या वाढल्याने इच्छुकांची संख्या वाढली असून एका पक्षाकडून उमेदवारी न दिल्यास दुसऱ्या पक्षाकडे उमेदवार जात आहेत. मात्र,तेथूनही उमेदवारी न मिळाल्यास थेट अपक्ष म्हणून उभे राहून मते कशी खाता येतील हे पहिले जाते. तसेच,समोरच्या पक्षाला नामोहरण करण्यासाठी आयारामांची चलती जोरात सुरू असून आयारामांना तिकीट लवकर दिले जात आहे. त्यामुळे मूळ ज्याचा दावा असतो. त्याचे खच्चीकरण होऊन तो अपक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे.


यंदाची निवडणूक २८८ जागांसाठी होणार आहे. आपल्याच मूळ पक्षाकडून तिकीट नाकारल्याने बऱ्याच उमेदवारांनी आपल्या पक्षाविरोधात बंड केले आहे त्यामुळे अशा मंडळांना शांत करण्याचे प्रयत्न सर्वच पक्षांकडून मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यातच अशा परिस्थितीमुळे यंदा त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास मात्र अपक्षांची चांगली चलती होणार आहे. त्यातच विविध पक्षांकडून ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री अशी असल्यामुळे समोरच्या व आपल्याच घटक पक्ष असणाऱ्या उमेदवारांना पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल व त्यामुळेही जिंकलेले अपक्ष गेमचेंजर ठरतील असे जाणकार सांगतात.

Comments
Add Comment

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला