Bandra Terminus Stampede : वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी! ७ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

मुंबई : मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर आज पहाटे प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. दिवाळीनिमित्त लोक आपापल्या घराकडे निघाल्यामुळे गर्दी उसळून चेंगराचेंगरी झाली. यात ९ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनस, वांद्रे (पू) येथील फलाट क्रमांक १ वर रविवारी पहाटे अडीच वाजेच्या वांद्रे-गोरखपूर (गाडी क्र. २२९२१) या गाडीत बसण्यासाठी मोठी गर्दी उसळली. दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांचा या गर्दीत समावेश होता. गाडीत बसण्यासाठी झालेली प्रचंड गर्दी पोलिसांनाही परिस्थिती आटोक्यात आणता आली नाही. गाडी स्थानकावर येताच लोक त्यात चढण्यासाठी धडपड करू लागले. यावेळी चेंगराचेंगरी झाली. यात ९ जण जखमी झाले असून त्यांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी ७ जणांची प्रकृती स्थिर असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.



जखमींची माहिती


जखमींमध्ये शब्बीर अब्दुल रहमान, परमेश्वर सुखदार गुप्ता, रवींद्र हरिहर चुमा, मसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती, संजय तिलकराम कांगे, दिव्यांशु योगेंद्र यादव, मोहम्मद शरीफ शेख, इंद्रजित साहनी, नूर मोहम्मद शेख यांचा समावेश आहे. यापैकी इंद्रजित सहानी आणि नूर मोहम्मद यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

Comments
Add Comment

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात आता 'आरोग्य कवच'

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार ६ मार्च रोजी मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, शुक्रवारी ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या अध्यक्षपदी दीपक सिंह यांची नियुक्ती

मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे महामंत्री दीपक आजाद सिंह यांची आज पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम

'जलवाहतूक क्षेत्रात जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणार'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचा कायापालट करून तेथे जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर राज्य

सिंधुदुर्गच्या विकासासाठी पर्यावरणाचा समतोल आणि जनहिताला प्राधान्य

मुंबई : केंद्र शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग च्या विविध