Bandra Terminus Stampede : वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी! ७ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

मुंबई : मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर आज पहाटे प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. दिवाळीनिमित्त लोक आपापल्या घराकडे निघाल्यामुळे गर्दी उसळून चेंगराचेंगरी झाली. यात ९ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनस, वांद्रे (पू) येथील फलाट क्रमांक १ वर रविवारी पहाटे अडीच वाजेच्या वांद्रे-गोरखपूर (गाडी क्र. २२९२१) या गाडीत बसण्यासाठी मोठी गर्दी उसळली. दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांचा या गर्दीत समावेश होता. गाडीत बसण्यासाठी झालेली प्रचंड गर्दी पोलिसांनाही परिस्थिती आटोक्यात आणता आली नाही. गाडी स्थानकावर येताच लोक त्यात चढण्यासाठी धडपड करू लागले. यावेळी चेंगराचेंगरी झाली. यात ९ जण जखमी झाले असून त्यांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी ७ जणांची प्रकृती स्थिर असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.



जखमींची माहिती


जखमींमध्ये शब्बीर अब्दुल रहमान, परमेश्वर सुखदार गुप्ता, रवींद्र हरिहर चुमा, मसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती, संजय तिलकराम कांगे, दिव्यांशु योगेंद्र यादव, मोहम्मद शरीफ शेख, इंद्रजित साहनी, नूर मोहम्मद शेख यांचा समावेश आहे. यापैकी इंद्रजित सहानी आणि नूर मोहम्मद यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास

मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १

राज्याच्या महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार ३५ हजार ८७६ पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

मुंबई : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल