Bandra Terminus Stampede : वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी! ७ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

मुंबई : मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर आज पहाटे प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. दिवाळीनिमित्त लोक आपापल्या घराकडे निघाल्यामुळे गर्दी उसळून चेंगराचेंगरी झाली. यात ९ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनस, वांद्रे (पू) येथील फलाट क्रमांक १ वर रविवारी पहाटे अडीच वाजेच्या वांद्रे-गोरखपूर (गाडी क्र. २२९२१) या गाडीत बसण्यासाठी मोठी गर्दी उसळली. दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांचा या गर्दीत समावेश होता. गाडीत बसण्यासाठी झालेली प्रचंड गर्दी पोलिसांनाही परिस्थिती आटोक्यात आणता आली नाही. गाडी स्थानकावर येताच लोक त्यात चढण्यासाठी धडपड करू लागले. यावेळी चेंगराचेंगरी झाली. यात ९ जण जखमी झाले असून त्यांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी ७ जणांची प्रकृती स्थिर असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.



जखमींची माहिती


जखमींमध्ये शब्बीर अब्दुल रहमान, परमेश्वर सुखदार गुप्ता, रवींद्र हरिहर चुमा, मसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती, संजय तिलकराम कांगे, दिव्यांशु योगेंद्र यादव, मोहम्मद शरीफ शेख, इंद्रजित साहनी, नूर मोहम्मद शेख यांचा समावेश आहे. यापैकी इंद्रजित सहानी आणि नूर मोहम्मद यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

Comments
Add Comment

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र