१२ वर्षात एकदा असा परफॉर्मन्स...न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर रोहितचे विधान

मुंबई: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पुणे येथील कसोटी सामन्यात ११३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह न्यूझीलंडने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडीही घेतली आहे. किवी संघाने पहिल्यांदा भारतात कसोटी मालिका जिंकली आहे.


तर दुसरीकडे भारतीय संघाने तब्बल १२ वर्षांनी मायभूमीत कसोटी मालिका गमावली आहे. याआधी भारतीय संघाला डिसेंबर २०१२मध्ये इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-२ असे पराभवास सामोरे जावे लागले होते.


सामना संपल्यानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत भाग घेतला. दरम्यान, रोहितने यादरम्यान असे काही म्हटले की यावरून चांगलाच गोंधळ झाला. रोहितने म्हटले की १२ वर्षात एकदा असा परफॉर्मन्स तर होऊ शकतो.


रोहित शर्मा म्हणाला, आम्ही केवळ २ सामने गमावले आहेत. आम्ही भारतात अनेक सामने जिंकलेत. येथे फलंदाजांनी खराब पिचवरही जबरदस्त कामगिरी केली आहे. तुम्ही त्यावर का लक्ष देत नाही. हे पहिल्यांदा घडले की आमची फलंदाजी कोसळली. १२ वर्षात इतकं तर अलाऊड आहे यार.


रोहित पुढे म्हणाला, जर आम्ही १२ वर्षांपासून कोलमडत आहोत तर आम्ही काहीच जिंकलो नसतो. भारतात आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत की आम्हाला प्रत्येक गोष्ट जिंकावीच लागेल. आपण ही सवय बनवली आहे. ही तुमची चूक नाही तर आम्ही स्वत:साठीचे हाय स्टँडर्ड सेट केलेले आहेत.


आम्ही घरच्या मैदानावर सलग १८ मालिका जिंकल्या आहेत. याचा अर्थ आम्ही बऱ्याच गोष्टी चांगल्या केल्या आहेत. आम्ही गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. मला वाटते की २-३ डावांत आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. मात्र असे तेव्हाच होते जेव्हा तुम्ही दीर्घकाळ सातत्याने चांगली कामगिरी करत असता.

Comments
Add Comment

Shreyas Iyer Health Update : 'स्टार बॅट्समन' श्रेयस अय्यरकडून मोठी अपडेट! गंभीर दुखापतीनंतर ICU मधून भावनिक पोस्ट, चाहत्यांना दिलासा!

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज (Star Batsman) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या एका गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात उपचार घेत आहे.

हरमनप्रीत कौर आणि तो ऐतिहासिक विक्रम: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी 'त्या' १७१ धावांची चर्चा!

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या