१२ वर्षात एकदा असा परफॉर्मन्स...न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर रोहितचे विधान

  41

मुंबई: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पुणे येथील कसोटी सामन्यात ११३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह न्यूझीलंडने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडीही घेतली आहे. किवी संघाने पहिल्यांदा भारतात कसोटी मालिका जिंकली आहे.


तर दुसरीकडे भारतीय संघाने तब्बल १२ वर्षांनी मायभूमीत कसोटी मालिका गमावली आहे. याआधी भारतीय संघाला डिसेंबर २०१२मध्ये इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-२ असे पराभवास सामोरे जावे लागले होते.


सामना संपल्यानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत भाग घेतला. दरम्यान, रोहितने यादरम्यान असे काही म्हटले की यावरून चांगलाच गोंधळ झाला. रोहितने म्हटले की १२ वर्षात एकदा असा परफॉर्मन्स तर होऊ शकतो.


रोहित शर्मा म्हणाला, आम्ही केवळ २ सामने गमावले आहेत. आम्ही भारतात अनेक सामने जिंकलेत. येथे फलंदाजांनी खराब पिचवरही जबरदस्त कामगिरी केली आहे. तुम्ही त्यावर का लक्ष देत नाही. हे पहिल्यांदा घडले की आमची फलंदाजी कोसळली. १२ वर्षात इतकं तर अलाऊड आहे यार.


रोहित पुढे म्हणाला, जर आम्ही १२ वर्षांपासून कोलमडत आहोत तर आम्ही काहीच जिंकलो नसतो. भारतात आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत की आम्हाला प्रत्येक गोष्ट जिंकावीच लागेल. आपण ही सवय बनवली आहे. ही तुमची चूक नाही तर आम्ही स्वत:साठीचे हाय स्टँडर्ड सेट केलेले आहेत.


आम्ही घरच्या मैदानावर सलग १८ मालिका जिंकल्या आहेत. याचा अर्थ आम्ही बऱ्याच गोष्टी चांगल्या केल्या आहेत. आम्ही गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. मला वाटते की २-३ डावांत आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. मात्र असे तेव्हाच होते जेव्हा तुम्ही दीर्घकाळ सातत्याने चांगली कामगिरी करत असता.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार