१२ वर्षात एकदा असा परफॉर्मन्स...न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर रोहितचे विधान

मुंबई: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पुणे येथील कसोटी सामन्यात ११३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह न्यूझीलंडने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडीही घेतली आहे. किवी संघाने पहिल्यांदा भारतात कसोटी मालिका जिंकली आहे.


तर दुसरीकडे भारतीय संघाने तब्बल १२ वर्षांनी मायभूमीत कसोटी मालिका गमावली आहे. याआधी भारतीय संघाला डिसेंबर २०१२मध्ये इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-२ असे पराभवास सामोरे जावे लागले होते.


सामना संपल्यानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत भाग घेतला. दरम्यान, रोहितने यादरम्यान असे काही म्हटले की यावरून चांगलाच गोंधळ झाला. रोहितने म्हटले की १२ वर्षात एकदा असा परफॉर्मन्स तर होऊ शकतो.


रोहित शर्मा म्हणाला, आम्ही केवळ २ सामने गमावले आहेत. आम्ही भारतात अनेक सामने जिंकलेत. येथे फलंदाजांनी खराब पिचवरही जबरदस्त कामगिरी केली आहे. तुम्ही त्यावर का लक्ष देत नाही. हे पहिल्यांदा घडले की आमची फलंदाजी कोसळली. १२ वर्षात इतकं तर अलाऊड आहे यार.


रोहित पुढे म्हणाला, जर आम्ही १२ वर्षांपासून कोलमडत आहोत तर आम्ही काहीच जिंकलो नसतो. भारतात आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत की आम्हाला प्रत्येक गोष्ट जिंकावीच लागेल. आपण ही सवय बनवली आहे. ही तुमची चूक नाही तर आम्ही स्वत:साठीचे हाय स्टँडर्ड सेट केलेले आहेत.


आम्ही घरच्या मैदानावर सलग १८ मालिका जिंकल्या आहेत. याचा अर्थ आम्ही बऱ्याच गोष्टी चांगल्या केल्या आहेत. आम्ही गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. मला वाटते की २-३ डावांत आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. मात्र असे तेव्हाच होते जेव्हा तुम्ही दीर्घकाळ सातत्याने चांगली कामगिरी करत असता.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून