विक्रमगडचा गड राखणार कोण..?

महाविकास आघाडी,महायुतीत चुरशीची लढत होणार


मोखाडा : विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा ग्रामीण भागातील मतदार संघ असून आजमितीला जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे याच मतदारसंघातून सुरू आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर वर्चस्व मिळविण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी प्रयत्नशील आहेत.२००९ आणि २०१४ ही दोन दशके विक्रमगड मतदारसंघ भाजपा बालेकिल्ला राहिलेला होता. मात्र,२०१९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे सुनील भुसारा यांनी मंत्री पुत्र विद्यमान खासदार डॉ.हेमंत सावरा यांचा मोठ्या फरकाने पराभव करून भाजपाचा बालेकिल्ला ढासळला होता.परंतु गेलेला विक्रमगडचा गड पुन्हा जिंकण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून तुल्यबळ उमेदवार देऊन विजयश्री मिळविण्यासाठी योग्य उमेदवार कोण ? असणार हे अजूनही घोषित केलेले.यामुळे महायुतीतील इच्छुक उमेदवारांच्या भुवया उंचावल्या आहेत.


२०१४ च्या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेत एकूण मतदारांची संख्या २,४६,४३१ होती. यापैकी १,६५,५२४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता तर ८०,९०७ मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली होती. या निवडणुकीत भाजपाचे विष्णू सावरा यांना ४०,२०१ मते मिळाली होती तर शिवसेनेचे प्रकाश निकम यांना ३६,३५६ मत मिळाली होती. तसेच आताचे विद्यमान आमदार सुनील भुसारा यांना तिसऱ्या क्रमांकाची ३२,०५३ इतकीच मत मिळाली होती.या निवडणुकीत विष्णू सावरा यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रकाश निकम यांचा ३८४५ मतांनी पराभव केला होता.चौथ्या क्रमांकावर बहुजन विकास आघाडीचे हेमंत गोविंद यांना १८०८५ एवढी मत मिळाली होती.मात्र २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणाचे चित्र पुर्ण बदलून गेले आणि भाजपाच्या परंपरागत बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुनील भुसारा यांनी सुरुंग लावून आपला विजयश्री खेचून आणला होता.


२०१९ च्या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेत एकूण मतदारांची संख्या २,६६,५७६ होती यापैकी १,८२,८४१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.तर ८३,७३५ मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठफिरवली होती.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे सुनील भुसारा यांना ८८,४२५ मत मिळाली होती.तर भाजपाचे हेमंत सावरा यांना ६७,०२६ एवढी मत मिळाली होती.या निवडणुकीत सुनील भुसारा यांनी २१ हजार ३९९ मतांनी भाजपाचे हेमंत सावरा यांचा पराभव केला होता.निवडणुकीत चर्चेचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची ८ हजार ४९५ मते कोण्या एका राजकीय पक्षांच्या नेत्याला न मिळता नोटा समोरील बटण दाबून मतदार राजाने आपली नाराजगी व्यक्त केली होती.त्यामुळे याही निवडणुकीत मतदारांना आपला योग्य उमेदवार आवडतो का ? की मागील निवडणुकीतील नोटांच्या मताची आकडेवारी वाढते की काय अशी शंका उपस्थित होत आहे.


यावर्षीच्या ही निवडणुकीत महाविकास आघाडी कडून इच्छुकांची गर्दी नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे तिकीट विद्यमान आमदार सुनील भुसारा यांना मिळाले असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.मात्र महायुती मध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी दावेदारी दाखल केल्यामुळे विक्रमगड विधानसभेतील महायुतीचा तिढा अजूनही सुटलेला नाही..

Comments
Add Comment

High Court Recruitment Exam : उच्च न्यायालय भरती परीक्षेत 'AI' च्या मदतीने कॉपी; धुळ्यातील धक्कादायक प्रकार

धुळे : आजवर परीक्षेत कॉपी करण्याच्या अनेक जुन्या पद्धती समोर आल्या आहेत, मात्र आता कॉपीबहाद्दरांनी यासाठी चक्क

Jalgaon : जळगाव–दिल्ली विमानसेवा तात्पुरती स्थगित; बहुप्रतिक्षीत विमानसेवा कधी सुरु होणार ?

जळगाव : अलायन्स एयर (Alliance Air) या विमान कंपनीतर्फे २ मेपासून सुरु होणारी बहुप्रतिक्षीत जळगाव–दिल्ली (इंदूरमार्गे) ही

महाराष्ट्राच्या 'मिसिंग लिंक' या ड्रीम प्रोजेक्टची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणारा महत्त्वाकांक्षी असलेला मिसिंग लिंक

Eknath Shinde On Missing Link : पैसे न घेता गाड्या सोडा..."; मिसिंग लिंकवर ट्रॅफिक कोंडी पाहताच हेलिपॅडवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा पोलिसांना थेट फोन!

मुंबई : सलग आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे, महाबळेश्वर आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या

Devendra Fadnavis On missing link : "तुमच्या सरकारने थांबवलेलं काम आम्ही पूर्ण केलं..."; फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला, मिसिंग लिंकचं दिमाखात लोकार्पण!

मुंबई : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

Digital Census 2027 : शंभूराज देसाई यांच्याकडून साताऱ्यात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; नागरिकांना 'स्व-गणनेत' सहभागी होण्याचे आवाहन

सातारा : भारताच्या विकासाचा पाया ठरणारी आणि भविष्यातील धोरणांची दिशा ठरवणारी आगामी 'जनगणना २०२७' आता अधिक हायटेक