विक्रमगडचा गड राखणार कोण..?

महाविकास आघाडी,महायुतीत चुरशीची लढत होणार


मोखाडा : विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा ग्रामीण भागातील मतदार संघ असून आजमितीला जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे याच मतदारसंघातून सुरू आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर वर्चस्व मिळविण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी प्रयत्नशील आहेत.२००९ आणि २०१४ ही दोन दशके विक्रमगड मतदारसंघ भाजपा बालेकिल्ला राहिलेला होता. मात्र,२०१९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे सुनील भुसारा यांनी मंत्री पुत्र विद्यमान खासदार डॉ.हेमंत सावरा यांचा मोठ्या फरकाने पराभव करून भाजपाचा बालेकिल्ला ढासळला होता.परंतु गेलेला विक्रमगडचा गड पुन्हा जिंकण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून तुल्यबळ उमेदवार देऊन विजयश्री मिळविण्यासाठी योग्य उमेदवार कोण ? असणार हे अजूनही घोषित केलेले.यामुळे महायुतीतील इच्छुक उमेदवारांच्या भुवया उंचावल्या आहेत.


२०१४ च्या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेत एकूण मतदारांची संख्या २,४६,४३१ होती. यापैकी १,६५,५२४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता तर ८०,९०७ मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली होती. या निवडणुकीत भाजपाचे विष्णू सावरा यांना ४०,२०१ मते मिळाली होती तर शिवसेनेचे प्रकाश निकम यांना ३६,३५६ मत मिळाली होती. तसेच आताचे विद्यमान आमदार सुनील भुसारा यांना तिसऱ्या क्रमांकाची ३२,०५३ इतकीच मत मिळाली होती.या निवडणुकीत विष्णू सावरा यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रकाश निकम यांचा ३८४५ मतांनी पराभव केला होता.चौथ्या क्रमांकावर बहुजन विकास आघाडीचे हेमंत गोविंद यांना १८०८५ एवढी मत मिळाली होती.मात्र २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणाचे चित्र पुर्ण बदलून गेले आणि भाजपाच्या परंपरागत बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुनील भुसारा यांनी सुरुंग लावून आपला विजयश्री खेचून आणला होता.


२०१९ च्या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेत एकूण मतदारांची संख्या २,६६,५७६ होती यापैकी १,८२,८४१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.तर ८३,७३५ मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठफिरवली होती.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे सुनील भुसारा यांना ८८,४२५ मत मिळाली होती.तर भाजपाचे हेमंत सावरा यांना ६७,०२६ एवढी मत मिळाली होती.या निवडणुकीत सुनील भुसारा यांनी २१ हजार ३९९ मतांनी भाजपाचे हेमंत सावरा यांचा पराभव केला होता.निवडणुकीत चर्चेचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची ८ हजार ४९५ मते कोण्या एका राजकीय पक्षांच्या नेत्याला न मिळता नोटा समोरील बटण दाबून मतदार राजाने आपली नाराजगी व्यक्त केली होती.त्यामुळे याही निवडणुकीत मतदारांना आपला योग्य उमेदवार आवडतो का ? की मागील निवडणुकीतील नोटांच्या मताची आकडेवारी वाढते की काय अशी शंका उपस्थित होत आहे.


यावर्षीच्या ही निवडणुकीत महाविकास आघाडी कडून इच्छुकांची गर्दी नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे तिकीट विद्यमान आमदार सुनील भुसारा यांना मिळाले असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.मात्र महायुती मध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी दावेदारी दाखल केल्यामुळे विक्रमगड विधानसभेतील महायुतीचा तिढा अजूनही सुटलेला नाही..

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त