विक्रमगडचा गड राखणार कोण..?

महाविकास आघाडी,महायुतीत चुरशीची लढत होणार


मोखाडा : विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा ग्रामीण भागातील मतदार संघ असून आजमितीला जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे याच मतदारसंघातून सुरू आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर वर्चस्व मिळविण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी प्रयत्नशील आहेत.२००९ आणि २०१४ ही दोन दशके विक्रमगड मतदारसंघ भाजपा बालेकिल्ला राहिलेला होता. मात्र,२०१९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे सुनील भुसारा यांनी मंत्री पुत्र विद्यमान खासदार डॉ.हेमंत सावरा यांचा मोठ्या फरकाने पराभव करून भाजपाचा बालेकिल्ला ढासळला होता.परंतु गेलेला विक्रमगडचा गड पुन्हा जिंकण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून तुल्यबळ उमेदवार देऊन विजयश्री मिळविण्यासाठी योग्य उमेदवार कोण ? असणार हे अजूनही घोषित केलेले.यामुळे महायुतीतील इच्छुक उमेदवारांच्या भुवया उंचावल्या आहेत.


२०१४ च्या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेत एकूण मतदारांची संख्या २,४६,४३१ होती. यापैकी १,६५,५२४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता तर ८०,९०७ मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली होती. या निवडणुकीत भाजपाचे विष्णू सावरा यांना ४०,२०१ मते मिळाली होती तर शिवसेनेचे प्रकाश निकम यांना ३६,३५६ मत मिळाली होती. तसेच आताचे विद्यमान आमदार सुनील भुसारा यांना तिसऱ्या क्रमांकाची ३२,०५३ इतकीच मत मिळाली होती.या निवडणुकीत विष्णू सावरा यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रकाश निकम यांचा ३८४५ मतांनी पराभव केला होता.चौथ्या क्रमांकावर बहुजन विकास आघाडीचे हेमंत गोविंद यांना १८०८५ एवढी मत मिळाली होती.मात्र २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणाचे चित्र पुर्ण बदलून गेले आणि भाजपाच्या परंपरागत बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुनील भुसारा यांनी सुरुंग लावून आपला विजयश्री खेचून आणला होता.


२०१९ च्या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेत एकूण मतदारांची संख्या २,६६,५७६ होती यापैकी १,८२,८४१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.तर ८३,७३५ मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठफिरवली होती.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे सुनील भुसारा यांना ८८,४२५ मत मिळाली होती.तर भाजपाचे हेमंत सावरा यांना ६७,०२६ एवढी मत मिळाली होती.या निवडणुकीत सुनील भुसारा यांनी २१ हजार ३९९ मतांनी भाजपाचे हेमंत सावरा यांचा पराभव केला होता.निवडणुकीत चर्चेचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची ८ हजार ४९५ मते कोण्या एका राजकीय पक्षांच्या नेत्याला न मिळता नोटा समोरील बटण दाबून मतदार राजाने आपली नाराजगी व्यक्त केली होती.त्यामुळे याही निवडणुकीत मतदारांना आपला योग्य उमेदवार आवडतो का ? की मागील निवडणुकीतील नोटांच्या मताची आकडेवारी वाढते की काय अशी शंका उपस्थित होत आहे.


यावर्षीच्या ही निवडणुकीत महाविकास आघाडी कडून इच्छुकांची गर्दी नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे तिकीट विद्यमान आमदार सुनील भुसारा यांना मिळाले असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.मात्र महायुती मध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी दावेदारी दाखल केल्यामुळे विक्रमगड विधानसभेतील महायुतीचा तिढा अजूनही सुटलेला नाही..

Comments
Add Comment

Malegaon : चाळीसगाव फाटा ते शिवतीर्थ नवीन जलवाहिनीस महासभेत मंजुरी

Malegaon : ऐन पावसाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील

Tribal Development : आदिवासींच्या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेचे दार उघडले

- राज्य शासनाचा पुढाकार; 'शबरी नॅचरल्स' ब्रँडचे नाशिकच्या दिंडोरीत प्रक्रिया युनिट मुंबई : राज्यातील आदिवासी

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी