शिंदे आणि उबाठा गटात बंडखोरी होण्याची शक्यता

दीपक मोहिते


बोईसर विधानसभा मतदारसंघ हा दोन्ही शिवसेनेला डोकेदुखी ठरला आहे.ही जागा महाविकास आघाडीने शिवसेना ( उबाठा ) गटाला तर महायुतीने एकनाथ शिंदे गटासाठी सोडली आहे.उबाठा गटाकडून डॉ.विश्वास वळवी याना तर शिंदे गटाने अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी जगदीश धोडी यांचे नाव आघाडीवर आहे.अशावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कमलाकर दळवी व भाजपचे माजी आ.विलास तरे यांनी एन्ट्री केल्यामुळे दोन्ही गटात खळबळ उडाली आहे.
विलास तरे सध्या भाजपमध्ये असून ते तिकिटांच्या शर्यतीमध्ये सुरुवातीपासून होते व आजही आहेत.पण हा मतदारसंघ जागावाटपात शिंदे गटाकडे गेल्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे.त्यामुळे तरे आता भाजपचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.


दुसरीकडे उबाठा गटातर्फे येथे डॉ.विश्वास वळवी यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर पालघर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कमलाकर दळवी हे नाराज झाले असून बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अविभक्त शिवसेनेचे उमेदवार असलेले कमलाकर दळवी यांनी त्या निवडणुकीत सुमारे ५६ हजार मते मिळवली होती.पराभूत झाल्यानंतरही पक्ष संघटनेत कार्यरत राहून ग्रामीण भागात पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु ठेवले होते. शिवसेना पक्षफुटी दरम्यान अनेक मातब्बर नेते शिंदे गटात सामील होत असताना,त्यांनी ठाकरे गटात राहून आपले काम सुरु ठेवले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदार संघाच्या ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती.


विधानसभा निवडणुक जाहीर होण्याच्या तोंडावर पक्षात प्रवेश केलेले डॉ. विश्वास वळवी हे बोईसर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाल्यामुळे उबाठा गटातील अनेक जण नाराज झाले आहेत.निष्ठावंतांना डावलून जिल्ह्याबाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास आम्ही बंडखोरी करू,असा इशारा नाराज पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. गुरूवारी दुपारी स्थानिक आणि निष्ठावंताला उमेदवारी देण्यात यावी,या मागणीसाठी बोईसर विधानसभा क्षेत्रातील उबाठा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मासवण गावात एकत्र आले होते. यावेळी स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी देण्यात यावी,अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रमुखांकडे केली.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य