फलंदाजांच्या अपयशामुळे ४३३१ दिवसांनंतर भारताचा मायदेशात पराभव

मुंबई : न्यूझीलंडने भारतात येऊन इतिहास रचला आहे. जे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका कोणालाच जमलं नव्हते, ते न्यूझीलंडने करुन दाखवले आहे. इंग्लंडने २०१२ मध्ये भारतीय संघाला मायदेशात खेळताना कसोटी मालिकेत पराभूत केले होते. त्यानंतर कुठल्याही संघाला भारतात कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. मात्र न्यूझीलंडने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकत मालिका २-० ने जिंकली आहे.

या सामन्यात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. वॉशिंग्टन सुंदरच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर भारताने न्यूझीलंडचा डाव २५९ धावांवर हाणून पाडला. न्यूझीलंडला पहिल्या डावात ३०० पेक्षा कमी धावांवर रोखल्यानंतर भारताकडे मोठी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. पहिल्या डावात रविंद्र जडेजाने केलेली ३८ धावांची खेळी ही सर्वात मोठी खेळी ठरली. इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताचा पहिला डाव अवघ्या १५६ धावांवर आटोपला. यासह न्यूझीलंडने पहिल्या डावात १०३ धावांची आघाडी घेतली.

सँटनरची गोलंदाजी


फिरकी गोलंदाजांचा सामना कसा करायचा, हे भारतीय फलंदाजांकडून शिकावे, असे म्हणतात. मात्र भारताचा प्लान भारतीय फलंदाजांवरच उलटल्याचे दिसून आले आहे. भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी खूप चांगल्याप्रकारे खेळतात. मात्र या सामन्यात भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजीविरुद्ध नागिण डान्स करताना दिसून आले. भारतीय फलंदाज डिफेन्स करताना गोंधळून जात होते. त्यामुळे ते मोठा फटका खेळण्याचा आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते. या प्रयत्नात त्यांना बाद व्हावे लागले. ज्या खेळपट्टीवर अश्विन, जडेजासारख्या गोलंदाजांना फलंदाजांना बाद करण्यासाठी घाम फुटत होता. त्याच खेळपट्टीवर सँटनरने पहिल्या डावात ७ आणि दुसऱ्या डावात ६ असे १३ गडी बाद केले.

रोहित शर्मा - विराट कोहली फ्लॉप


भारतीय कसोटी संघात युवा खेळाडूंना स्थान दिले गेले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही संघातील सर्वात अनुभवी फलंदाज आहेत. त्यामुळे संघ अडचणीत असताना, रोहित आणि विराटने जबाबदारी घेऊन खेळणे अतिशय महत्वाचे होते. मात्र हे दोघेही स्वस्तात बाद होऊन माघारी परतले. रोहित पहिल्या डावात शून्यावर माघारी परतला. तर दुसऱ्या डावात त्याला अवघ्या ८ धावा करता आल्या. तर विराट कोहली पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात १७ धावा करत माघारी परतला. हे दोघेही टिकले असते, तर नक्कीच भारतीय संघ सामन्यात कमबॅक करु शकला असता.

 
Comments
Add Comment

Shubman Gill Century : कर्णधार शुभमन गिल नावाचं 'वादळ' थांबायचं नाव घेत नाही! वेस्ट इंडिजला धुवून काढत रोहित शर्माचा 'हा' मोठा विक्रम मोडीत काढला.

यशस्वी जैस्वाल पाठोपाठ कर्णधार शुभमन गिलचे शानदार कसोटी शतक नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies 2nd Test Day 2)

हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माचे नाते चर्चेत: एकत्र फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच हार्दिक आणि

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज