राज ठाकरे यांनी केले गाडीचे सारस्थ्य

कल्याण (प्रतिनिधी) :कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपण आमदार म्हणून निवडून आलो होतो. त्याच दिवशी आपण आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरताना अनोखा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने हा दिवस आपल्यासाठी लकी असल्याची भावना राजू पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या घोषणेनुसार आज राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थिती दर्शवली. इतकेच नाही, तर उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना गाडीमध्ये बसवत राज ठाकरे यांनी स्वतः आपल्या गाडीचे सारस्थ्य केले.


२०१९ मध्ये आजच्याच दिवशी तत्कालीन विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आपण आमदार झालो होतो. आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि लकी आहे. राज ठाकरे पहिल्यांदा आपल्या आणि अविनाश जाधव यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः आले. आमच्या पाठीमागे राज साहेबांचा हात असून आम्ही अत्यंत आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही राजू पाटील यांनी यावेळी सांगितले. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजू पाटील यांच्या समर्थकांनी मोठी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले.

Comments
Add Comment

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Nanded Gurudwara Reform : नांदेड गुरुद्वारा सुधारणा कायदा स्थगित

मुंबई : नांदेड येथील ऐतिहासिक व पवित्र श्री हजूर अबचलनगर सचखंड गुरुद्वाराच्या प्रशासकीय व्यवस्थेबाबत १९५६ च्या

Devendra Fadnavis : व्यापक चर्चेअंतीच आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कायदा लादायचा सरकारचा उद्देश नाही मुंबई : अनुसूचित जातींच्या (SC) आरक्षण

वानखेडेच्या धर्तीवर कोकणात भव्य स्टेडियम उभारा; आमदार प्रवीण दरेकरांची विधानपरिषदेत मागणी

माणगाव, पोलादपूर आणि रत्नागिरी क्रीडा संकुलांच्या प्रलंबित कामांना गती देणार - मंत्री अदिती तटकरे मुंबई :

ग्रामपंचायत संगणक परिचालकांना किमान २० हजार मानधन द्या; आमदार बच्चू कडूंची मागणी

शासन स्तरावर लवकरच संयुक्त बैठक घेणार: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण

Eknath Shinde : आम्ही तुडवायला नव्हे, तर शिवसेना वाढवायला आलोय

मुंबई : सहा खासदारांनंतर विधान परिषेदेतील आमदार सचिन अहिर यांना सोबत घेत शिवसेना मुख्य नेते व राज्याचे