सुरेश रैनाने खरेदी केली नवी Kia Carnival, किंमत आहे इतकी की...

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाच्या घरी नवी गाडी आली आहे. त्याने किया कार्निवल लिमोजिन खरेदी केली आहे. सुरेश रैनाने गाडीची चावी घेतल्यानंतर केक कापत सेलिब्रेट केला. भारतात कियाची नवी कार या महिन्याच्या सुरूवातीला ३ ऑक्टोबरला लाँच झाली आहे.



Kia Carnivalचे फीचर्स


नवी किया कार्निवल दोन कलर रंगात भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे. ही एक ७ सीटर कार आहे. या कारमध्ये फ्यूजन ब्लॅक आणि ग्लेशियर व्हाईट पर्ल कलर देण्यात आला आहे. या गाडीचे इंटीरियर आणि Umber 2 टोन कलरसोबत येतो. या लक्झरी कारमध्ये वाईड इलेक्ट्रिक ड्युअल सनरूफही मिळते. गाडीमध्ये लोकांच्या एंटरटेनमेंटसाठी १२ स्पीकर बोस सिस्टीमही लावण्यात आला आहे.


कियाच्या कारमध्ये वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन मिळतो. या गाडीमध्ये १८ इंचाच्या डायमंड कट अलॉय व्हील्स लागले आहेत. या कारमध्ये ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स चांगला बनवण्यासाठी पॅडल शिफ्टर्सही देण्यात आले आहेत. कियाच्या या कारमध्ये ADAS आणि ३६० डिग्री कॅमेरा फीचर देण्यात आला आहे. या कारमध्ये सेफ्टीसाठी ८ एअरबॅग्स देण्यात आले आहे.



इतकी आहे किंमत


ही नवी किया कार्निवल पेट्रोल आणि डिझेल पावरट्रेन सोबत मार्केटमध्ये आली आहे. या लक्झरी कारची एक्स शोरूम प्राईस ६३.९० लाख रूपये आहे.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या