वांद्रे येथील बॉलीवूड थीम पार्कच्या कामाला वेग

मुंबई (प्रतिनिधी): वांद्रे पश्चिम येथील बॉलीवूड थीम पार्क उभारण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच या बॉलीवूड थीम पार्कच्या कामाला सुरुवात झाली असून कामाने वेग घेतला आहे. लवकरच हे थीम पार्क पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या थीम पार्कच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास जाणून घेण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे.


एमएमआरडीए उभारत असलेली २३.६४३ किमी लांबीची ‘मेट्रो २ ब’ मार्गिका एस. व्ही. रोडवरून जात आहे. एस.व्ही.रोड परिसरातील पाली हिल, कार्टर रोडसारख्या ठिकाणी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गायक आदी मंडळी वास्तव्याला आहेत. या परिसरात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. या पार्श्वभूमीवर भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास मेट्रो मार्गिकांच्या खांबावर, मेट्रो मार्गिकांखालील रस्त्यावर रेखाटून पर्यटकांना, नागरिकांना आकर्षित करण्याची संकल्पना स्थानिक आमदार ॲड आशिष शेलार यांनी एमएमआरडीएसमोर मांडली होती.


त्यांच्या संकल्पनेनुसार एमएमआरडीएने २०० कोटी रुपये खर्च करून मेट्रो मार्गिकेखाली बॉलीवूड थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेतील ईएसआयसी नगर–वांद्रे पश्चिमदरम्यान एकूण सात मेट्रो स्थानकांखालील ३५५ खांबांमधील मोकळ्या जागेवर हे थीम पार्क उभारण्यात येत आहे. सप्टेंबरमध्ये शेलार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली असून आता कामाने वेग घेतला आहे. शिल्प, एलईडी दिवे, डिजिटल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर या थीम पार्कमध्ये केला जाणार आहे.

Comments
Add Comment

केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या छोट्या बच्चूंसाठी गायिका डॉ अनुराधा पौडवाल यांनी दिला असा मदतीचा हात...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयासाठी आता विख्यात गायिका

एसबीआयकडून मोठ्या प्रमाणावर भरती: ३,५०० अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती

मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि

घाटकोपर स्टेशनजवळील रविशा टॉवरला आग, २०० हून अधिक जणांची सुटका

मुंबई : घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील रविशा टॉवर या १३ मजली कमर्शियल इमारतीच्या पहिल्या

मुंबईहून सुटणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा अपघात टळला

मुंबई : उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे एक मोठा रेल्वे अपघात टळला. मुंबईहून भागलपूरला जाणारी लोकमान्य टिळक

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न स्वप्नच रहाणार, ४२६ फ्लॅट्सची सोडत, पण किंमती आवाक्याबाहेर? वाचा A टू Z

मुंबईत ‘घर’ का परवडेना? किंमत ५४ लाखांपासून १ कोटीपर्यंत! मग 'अत्यल्प व अल्प उत्पन्न' गटाचा नेमका अर्थ काय? मुंबई :

मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबई: मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्यांचा, समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर