वांद्रे येथील बॉलीवूड थीम पार्कच्या कामाला वेग

  66

मुंबई (प्रतिनिधी): वांद्रे पश्चिम येथील बॉलीवूड थीम पार्क उभारण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच या बॉलीवूड थीम पार्कच्या कामाला सुरुवात झाली असून कामाने वेग घेतला आहे. लवकरच हे थीम पार्क पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या थीम पार्कच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास जाणून घेण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे.


एमएमआरडीए उभारत असलेली २३.६४३ किमी लांबीची ‘मेट्रो २ ब’ मार्गिका एस. व्ही. रोडवरून जात आहे. एस.व्ही.रोड परिसरातील पाली हिल, कार्टर रोडसारख्या ठिकाणी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गायक आदी मंडळी वास्तव्याला आहेत. या परिसरात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. या पार्श्वभूमीवर भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास मेट्रो मार्गिकांच्या खांबावर, मेट्रो मार्गिकांखालील रस्त्यावर रेखाटून पर्यटकांना, नागरिकांना आकर्षित करण्याची संकल्पना स्थानिक आमदार ॲड आशिष शेलार यांनी एमएमआरडीएसमोर मांडली होती.


त्यांच्या संकल्पनेनुसार एमएमआरडीएने २०० कोटी रुपये खर्च करून मेट्रो मार्गिकेखाली बॉलीवूड थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेतील ईएसआयसी नगर–वांद्रे पश्चिमदरम्यान एकूण सात मेट्रो स्थानकांखालील ३५५ खांबांमधील मोकळ्या जागेवर हे थीम पार्क उभारण्यात येत आहे. सप्टेंबरमध्ये शेलार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली असून आता कामाने वेग घेतला आहे. शिल्प, एलईडी दिवे, डिजिटल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर या थीम पार्कमध्ये केला जाणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.