पंख छाटण्याचा प्रश्नच नाही; तुम्हाला आग लावण्याशिवाय दुसरं कामच नाही- नाना पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना फटकारले


मुंबई :पंख छाटण्याचा प्रश्नच नाही,मीच थोरातांना ठाकरे अन् पवारांकडे पाठवले,असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. दरम्यान, जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत नाना पटोले आणि उबाठा सेनेत खडाजंगी सुरु असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आता नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे जागावाटपावर चर्चेसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मीच पाठवले असल्याचे स्पष्ट केले.


यावर बोलताना नाना पटोले म्हणाले,महाविकास आघाडीचा जागावाटपावर तोडगा आजच निघायला हवा,अशीच आमचीही इच्छा आहे. जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी मीच बाळासाहेब थोरात यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पाठवले होते. जागांबाबत अदलाबदल होऊ शकतो, असा संदेश थोरात यांनी आणला आहे. त्यानंतर आता जागावाटपावर बैठक होणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.


माझे पंख छाटल्याचा प्रश्नच येत नाही. माझे पंख छाटलेले नाहीत, आमच्यापेक्षा तुम्ही महायुतीचा सागर बंगल्यावर आणि एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर काय चाललंय, कसे कपडे फाडले जात आहेत, ते दाखवा. तुम्हाला आग लावण्याशिवाय दुसरं कामच नाही, या शब्दांत पटोले यांनी माध्यमांना फटकारले.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील