मुंबई:आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात यशस्वी होण्यासाठी असा एक मंत्र सांगितला आहे जो विना मेहनत तुमच्या कामी येऊ शकतो. आचार्य चाणक्य यांचा मंत्र जर तुम्ही आयुष्यामध्ये वापरला तर तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल.
आचार्य चाणक्य यांचा मंत्र सर्वात कठीण कामालाही सोपे बनवतो. यामुळे प्रत्येक कामात यश मिळते. आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्यांशी बोलताना नेहमी सौम्य असले पाहिजे. बोलताना सौम्य शब्दांचा वापर केला पाहिजे.
चाणक्य म्हणतात की जे कोणी मधुर वाणी बोलतात त्यामुळे समाजातील लोक प्रसन्न होतात. त्यांचे समाजमनात मित्र होतात. आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येक व्यक्ती आपल्या भाषेमध्ये अमृतरूपी मधुरता मिसळून बोलले पाहिजे.
व्यक्तीचे मधुर वाणी त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळवून देते. तसेच त्या व्यक्तीची बिघडलेली कामेही पूर्ण होतात. व्यक्तीची मधुर वाणी दुसऱ्या व्यक्तीचे मन मोहून घेते. यामुळे संबंध चांगले होतात आणि कामे थांबत नाहीत. या व्यक्ती सगळ्यांना आपलेसे करतात.
जी व्यक्ती मधुर भाषा बोलते ती व्यक्ती कधीही द्रारिद्री राहत नाही. आपल्या मधुर वाणीने ती समाजात आपले जीवन चांगल्या पद्धतीने घालवते.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…