Hockey : ऑलिम्पिक यशानंतर भारताचा पहिला पराभव

मुंबई: जर्मनीने हॉकीच्या सामन्यात भारताचा २-० असा पराभव झाला आहे. जर्मनीचा संघ सध्या २ सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे आणि मालिकेतील पहिला सामना नवी दिल्लीत खेळवण्यात आला. सामन्याचा पहिला गोल चौथ्या मिनिटात हेनरिक मर्टजेन्सने केला .तर ३०व्या मिनिटाला कर्णधार लूकस विंडफेडरने पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये रूपांतरित केला आणि जर्मनीला आघाडी मिळवून दिली.


जर्मनीने शेवटपर्यंत ही आघाडी कायम राखत विजय मिळवला. २०१४ नंतर दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेला पहिला आंतरराष्ट्रीय हॉकी सामना होता. त्यामुळे या सामन्याला प्रेक्षकांची मोठी गर्दी होती. जर्मनीचा संघ सध्या हॉकीमध्ये वर्ल्ड चॅम्पियन आहे.



तुटला हा रेकॉर्ड


भारतीय हॉकी संघाच्या अनोखी स्ट्रीकचा अंत झाला. गेल्या ६४७ दिवसांतील हा पहिला सामना आहे जेव्हा भारतीय संघाने एकही गोल स्कोर केला नाही. तर ऑगस्ट २०२२नंतर हा पहिला सामना आहे जिथे टीम इंडियाला कोणताही गोल न करता पराभव सहन करावा लागला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंहचे यशही दिसले कारण टीम इंडियाला यात ७ पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र सरपंच साहेब नावाने प्रसिद्ध असणाऱ्या हरमनप्रीतला पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करता आले नाही.


कर्णधार हरमनप्रीतचा दिवस इतका खराब होता की जेव्हा २६व्या मिनिटाला टीम इंडियाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला तेव्हा हरमनप्रीत एक वर्ल्ड क्लस ड्रॅगफ्लिकर असताना जर्मनीविरुद्ध सामन्यात पेनल्टी स्ट्रोकवर गोल करू शकला नाही. जर्मनी सध्या वर्ल्ड चॅम्पियन आहे आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकले होते.

Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील