Bengaluru : अरे बाप रे! ७ मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे क्षणात कोसळली; ७ जणांचा मृत्यू

Share

Bengaluru : कर्नाटकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे २२ ऑक्टोबर रोजी बेंगळुरूमध्ये एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. कर्नाटकमधील बाबूसापल्य परिसरामध्ये इमारत कोसळल्यानंतर आणखी ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातात झालेल्या मृतांची संख्या सात झाली आहे. २१ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एका मजुराचा २२ ऑक्टोबरच्या रात्री मृतदेह सापडला. १३ कामगारांना वाचवण्यात यश आलं असून सहा जण जखमी झाले आहेत.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितल की, ज्यांच्या नावावर इमारत बांधली जात होती भवन रेड्डी आणि कंत्राटदार मुनियप्पा यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, या इमारतीत केवळ ४ मजले बांधण्यास परवानगी देण्यात आली होती, मात्र ७ मजले बांधले जात आहेत. एनडीआरएफच्या पथकाने ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रात्रभर बचावकार्य केले. आज सकाळी श्वानपथक पथकालाही पाचारण करण्यात आले. टीमने ढिगारा हटवण्यासाठी मोठ्या मशिन्ससुद्धा मागवल्या आहेत.

कर्नाटकात इमारत कोसळल्यानंतर राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसवर विरोधी पक्ष जेडीएसने बेंगळुरूची दुर्दशा निर्माण केल्याचा आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, दुबई आणि दिल्लीत काय चालू आहे ते तुम्ही पाहिलं असेलच. देशाच्या विविध भागांत हीच परिस्थिती आहे. आपण निसर्गाला रोखू शकत नाही, परंतु आपण व्यवस्थापन करत आहोत.

बेकायदेशीरपणे इमारत बांधली जात आहे

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार मंगळवारी रात्री घटनास्थळी पोहोचले होते. २१ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची त्यांनीच माहिती दिली. ६०/४० जागेवर बेकायदेशीरपणे इमारत बांधली जात असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

बिहारमधील ३ मृत

अतिरिक्त आयुक्त म्हणाले की, ५ मृतांपैकी ३ मजूर बिहारचे होते, त्यांची नावे हरमन (२६), त्रिपाल (३५), मोहम्मद साहिल (१९) अशी आहेत. त्याच वेळी, सत्य राजू (२५) आणि शंकर यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

गेले तीन दिवस कर्नाटकात पाऊस

गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बंगळूरसह कर्नाटकातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तर बंगळूरच्या येलाहंका आणि आसपासच्या अनेक भागात पूर आलाय. येलहंकामधील मध्य विहार कंबरभर पाण्याने भरले आहे. मदत आणि बचाव कर्मचाऱ्यांनी बोटीच्या मदतीने लोकांना बाहेर काढले आहे.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

2 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

3 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago