BRICS परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला रवाना

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी BRICS परिषदेसाठी दोन दिवसांच्या २२-२३ ऑक्टोबर दौऱ्यासाठी रशियाच्या कझान शहराच्या दिशेने रवाना झाले आहेत. ब्रिक्स परिषदेसोबत संपूर्ण जगाची नजर पंतप्रधान मोदींवर असणार आहे. ते रशियामध्ये कोणत्या देशांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय चर्चा करतील यावर साऱ्यांच्या नजरा असणार आहेत.


रशियात भारताचे राजदूत विनय कुमार यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी कझानमध्ये ब्रिक्स सदस्य देशांच्या समकक्षांसह द्विपक्षीय बैठक करतील. सूत्रांच्या माहितीनुसार, या परिषदेत आर्थिक सहकार, जलवायू परिवर्तन, आंतरराष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.



काय आहे BRICS


ब्रिक्स हा असा समूह आहे जो जगातील ४५ टक्के लोकसंख्या, जगातील ३३ टक्के जमीन आणि जगातील २८ टक्के अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतो. ब्रिक्सला BRIC या नावाने ओळखले जात होते. याची स्थापना २००६मध्ये सेंट पीटर्सबर्गमध्ये झाली. पहिल्या ब्रिक शिखर परिषदेचे आयोजन २००९ मध्ये रशियाच्या येकार्टिनबर्ग शहरात झाली होती.



किती आहे ब्रिक्सची ताकद


१० देशांच्या या समूहातील देशांची जर लोकसंख्या पाहिली तर जगाच्या ४५ टक्के आणि जगातील अर्थव्यवस्थेच्या २८.५ टक्के आहे. या आकड्यांवरून तुम्ही ब्रिक्सच्या ताकदीचा अंदाज लावू शकता.

कोणत्या मुद्द्यांवर केली जाते चर्चा


ब्रिक्स सदस्य देशांदरम्यान सहयोगाच्या मुद्द्यांवर नेते परिषदेत चर्चा करतात. याशिवाय व्यापार, आर्थिक, आरोग्य, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शेती, पर्यावरण, ऊर्जा, लेबर, लाचविरोधी, तसेच अँटी ड्रग्स सारख्या मुद्द्यांवरही चर्चा केली जाते.
Comments
Add Comment

लाल किल्ला स्फोट प्रकरणी एनआयएच्या तपासातून हाती आली धक्कादायक माहिती, २०२३ पासूनचा दहशतवाद्यांचा कट उघड

नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार स्फोटाच्या तपासात महत्वाची माहिती समोर आली

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,