Health: थंडीत गिझरच्या पाण्याने आंघोळ करता का? तर आधीच व्हा सावध

मुंबई: थंडी काहीच दिवसांत येणार आहे. या मोसमात कुडकुडणाऱ्या थंडीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी अनेक उपाय करतात. काही लोक तर या मोसमात अनेक दिवस आंघोळही करत नाही तर अनेकजण गिझरच्या गरम पाण्याने दररोज आंघोळ करतात.


गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने बरं वाटतं तसेच शरीरालाही रिलॅक्स वाटतं. मात्र तुम्हाला माहीत आहे का थंडीच्या दिवसांत गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने अनेक नुकसानही होते. यामुळे आरोग्यासही धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे सावधानता बाळगली पाहिज.



त्वचेच्या समस्या


थंडीच्या दिवसांत गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेच्या समस्या होऊ शकतात. गरम पाण्यामुळे त्वचेचा ओलावा कमी होतो. यामुळे त्वचा रुक्ष आणि निर्जीव होते. यामुळे त्वचेवर डाग, खाज तसेच जळजळ होऊ शकते.



केस गळतात


गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने केसांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. गरम पाण्यामुळे केसांचीमुळे कमकुवत राहतात. यामुळे केस गळतात आणि टक्कलही पडू शकते.



हृदयाचा धोका वाढतो


गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने धोकाही वाढतो. खरंतर गरम पाण्याने आंघोळ केल्याने रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर वाढतो. यामुळे हृदयावरचा दबाव वाढतो. थंडीच्या दिवसांत खूप गरम पाणी वापरू नका.


आंघोळीसाठी थंडीच्या दिवसांत गरम पाण्याच्या जागी कोमट पाण्याचा वापर करा.
आंघोळीनंतर त्वचेवर मॉश्चरायजर लावा.

Comments
Add Comment

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण