Health: थंडीत गिझरच्या पाण्याने आंघोळ करता का? तर आधीच व्हा सावध

  44

मुंबई: थंडी काहीच दिवसांत येणार आहे. या मोसमात कुडकुडणाऱ्या थंडीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी अनेक उपाय करतात. काही लोक तर या मोसमात अनेक दिवस आंघोळही करत नाही तर अनेकजण गिझरच्या गरम पाण्याने दररोज आंघोळ करतात.


गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने बरं वाटतं तसेच शरीरालाही रिलॅक्स वाटतं. मात्र तुम्हाला माहीत आहे का थंडीच्या दिवसांत गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने अनेक नुकसानही होते. यामुळे आरोग्यासही धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे सावधानता बाळगली पाहिज.



त्वचेच्या समस्या


थंडीच्या दिवसांत गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेच्या समस्या होऊ शकतात. गरम पाण्यामुळे त्वचेचा ओलावा कमी होतो. यामुळे त्वचा रुक्ष आणि निर्जीव होते. यामुळे त्वचेवर डाग, खाज तसेच जळजळ होऊ शकते.



केस गळतात


गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने केसांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. गरम पाण्यामुळे केसांचीमुळे कमकुवत राहतात. यामुळे केस गळतात आणि टक्कलही पडू शकते.



हृदयाचा धोका वाढतो


गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने धोकाही वाढतो. खरंतर गरम पाण्याने आंघोळ केल्याने रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर वाढतो. यामुळे हृदयावरचा दबाव वाढतो. थंडीच्या दिवसांत खूप गरम पाणी वापरू नका.


आंघोळीसाठी थंडीच्या दिवसांत गरम पाण्याच्या जागी कोमट पाण्याचा वापर करा.
आंघोळीनंतर त्वचेवर मॉश्चरायजर लावा.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी