IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियामध्ये मोठा बदल

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या के. एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाला आठ विकेटनी पराभव सहन करावा लागला. न्यूझीलंडने तब्बल ३६ वर्षांनी भारतीय जमिनीवर कसोटीत विजय मिळवला. आता दोन्ही देशांदरम्यान दुसरा सामना २४ ऑक्टोबरला पुण्यात खेळवला जाईल.


आता दुसऱ्या कसोटीच्या आधी भारतीय संघात बदल पाहायला मिळत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरला या मालिकेती इतर दोन संघांसाठी सामील करण्यात आले आहे. सुंदर दुसऱ्या कसोटीच्या आधी पुण्यात भारतीय संघासोबत असेल. सुंदरने रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडूसाठी १५२ धावांची खेळी केली होती.



न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी १६ सदस्यीय भारतीय संघ -


रोहित शर्मा (कप्तान), जसप्रीत बुमराह (उप-कप्तान), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंगटन सुंदर.



बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा पराभव


बंगळुरूमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला ८ विकेटनी पराभव सहन करावा लागला. सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी घेतली. पहिल्या डावात ४६ धावांवर भारतीय संघ ऑलआऊट झाला. त्यानंतर पहिल्या डावात बॅटिंगसाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाने ४०२ धावा बोर्डावर झळकावल्या. यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात ४६२ धावा करत न्यूझीलंडसमोर विजयासाठी १०७ धावांचे आव्हान ठेवले होते. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने २ बाद ११० धावा करत ८ विकेटनी विजय मिळवला.

Comments
Add Comment

पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या

आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने मांडला आशिया कपचा मुद्दा, समस्येवर मार्ग काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई

ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.