IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियामध्ये मोठा बदल

Share

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या के. एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाला आठ विकेटनी पराभव सहन करावा लागला. न्यूझीलंडने तब्बल ३६ वर्षांनी भारतीय जमिनीवर कसोटीत विजय मिळवला. आता दोन्ही देशांदरम्यान दुसरा सामना २४ ऑक्टोबरला पुण्यात खेळवला जाईल.

आता दुसऱ्या कसोटीच्या आधी भारतीय संघात बदल पाहायला मिळत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरला या मालिकेती इतर दोन संघांसाठी सामील करण्यात आले आहे. सुंदर दुसऱ्या कसोटीच्या आधी पुण्यात भारतीय संघासोबत असेल. सुंदरने रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडूसाठी १५२ धावांची खेळी केली होती.

न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी १६ सदस्यीय भारतीय संघ –

रोहित शर्मा (कप्तान), जसप्रीत बुमराह (उप-कप्तान), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंगटन सुंदर.

बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा पराभव

बंगळुरूमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला ८ विकेटनी पराभव सहन करावा लागला. सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी घेतली. पहिल्या डावात ४६ धावांवर भारतीय संघ ऑलआऊट झाला. त्यानंतर पहिल्या डावात बॅटिंगसाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाने ४०२ धावा बोर्डावर झळकावल्या. यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात ४६२ धावा करत न्यूझीलंडसमोर विजयासाठी १०७ धावांचे आव्हान ठेवले होते. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने २ बाद ११० धावा करत ८ विकेटनी विजय मिळवला.

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

27 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

27 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

29 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

41 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

46 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

1 hour ago