Maharashtra Assembly Elections : महायुतीचं ठरलं! जागावाटपाचा तिढा सुटला!

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेचा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दिल्लीमध्ये गेले होते. या तिन्ही नेत्यांची अमित शाहा यांच्यासोबत रात्री उशिरा एक बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीतील जागावाटपावर चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७० आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ६० जागा मिळणार असल्याची माहिती आहे. भाजपाच्या कोट्यातूनच मित्रपक्षांना जागा दिल्या जाणार आहेत. पुढील २४ तासात जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.


ज्या जागांवर वाद चालू होता, तो सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये महायुतीला ब-यापैकी यश आल्याचे म्हटले जात आहे. अमित शाह यांच्या निवासस्थानी पार पडलेली ही बैठक एकूण अडीच तास चालली. जागावाटपाचा तिढा अमित शाह यांच्या समक्ष सोडवण्यात आला असून आता फक्त काहीच जागांचा प्रश्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


महायुतीचे भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाला कमीत कमी १५० जागा हव्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ९० जागांची मागणी होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कमीत कमी ६० जागा हव्या आहेत. असे असताना जागावाटपाची ही चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


असे असले तरी, महायुतीत एकीकडे जागावाटपावर चर्चा चालू आहे. मात्र दुसरीकडे महायुतीतील तिन्ही पक्षांपुढे अंतर्गत बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. ब-याच मतदारसंघांसाठी महायुतीत एकापेक्षा जास्त नेते इच्छुक आहे. या नेत्यांची त्या-त्या मतदारसंघांत तयारीदेखील चालू आहे. त्यामुळे एका पक्षाला जागा सुटल्यास दुस-या पक्षातील नेत बंड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी स्थिती निर्माण झाल्यास बंड शांत करण्याचे आव्हान महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांपुढे असणार आहे.

Comments
Add Comment

Bacchu Kadu : टीका करणाऱ्यांची आम्ही पर्वा करत नाही; अंगावर ३०० गुन्हे पण... नागपुरात बच्चू कडूंचा घणाघात

नागपूर : "इतर पक्षांनी आणि मोठ्या नेत्यांनी सोयीनुसार पक्ष बदलले, आघाड्या केल्या तेव्हा कुणी काही बोलले नाही, पण

Mother's Name Will On Document : आता हजेरीपत्रक आणि गुणपत्रिकेवर आईचं नाव अनिवार्य; सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू

मुंबई : राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून

Maharashtra Board 12th Result 2026 : बारावीचा निकाल ऑनलाईन कुठे आणि कसा पाहायचा? वेबसाईट क्रॅश झाल्यास मोबाईलवरच मिळवा झटपट रिझल्ट!

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज, शनिवार २ मे २०२६ रोजी इयत्ता १२ वी (HSC)

HSC Result 2026 : बारावी निकाल २०२६ जाहीर! राज्यात ८९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण; कोकणाने पुन्हा मारली बाजी

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) आज (२ मे २०२६) दुपारी १ वाजता इयत्ता

ED Summons Pratibha Chakankar : खरात प्रकरणात मोठी कारवाई! प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स; आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू

मुंबई : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत असून तपास अधिकच गडद होत चालला आहे.

Breaking News : धक्कादायक! ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर

पुणे : जिल्ह्यातील भोर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका गावात चार वर्षांच्या