Nitesh Rane : दाऊद गँगचे सर्व गुण घेतल्यामुळे उबाठाची 'डी' गँग झाली आहे!

आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतवर घणाघात


मुंबई : केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) दररोज कोणतेही विधान मांडतो. आज संजय राऊतने 'भाजपा पक्ष हा बिश्नोई गँग आहे', या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतला चांगलेच फटकारले आहे. हिंदूचा द्वेश करणं, त्यांना टार्गेट करणं, पाकिस्तानचे झेंडे फडकवणं, पाकिस्तान झिंदाबाद म्हणणं या सर्व दाऊद गँगचे गुण उबाठाने घेतलेले आहेत. म्हणून शिवसेना उबाठा ही 'डी' कंपनी आहे, असं आम्ही म्हणायचं का? त्यामुळे दुसऱ्यांना कोणत्याही गँगची उपमा देण्यापेक्षा उबाठाची डी कंपनी झालेली आहे त्यावर लक्ष द्यावे. नंतर भाजपाला नावं ठेवत बसावे, असा टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतला लगावला. त्याचबरोबर संजय राऊतचा मालक म्हणजेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला.


काल पुन्हा शरद पवार यांनी उद्धव ठाकरेच्या ईश्वरपूरमध्ये राहून कानाखाली मारली. एकीकडे उद्धव ठाकरे दिवसरात्र मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहतो, त्यासाठी कपडे देखील शिवत आहे. तर दुसऱ्याबाजूने शरद पवार, नाना पटोले हे यांचे रोज कपडे फाडण्याचे काम करत आहेत. म्हणून उद्धव ठाकरेची लायकी काय आहे, हे आम्ही सांगण्यापेक्षा मविआचे मित्रमंडळ पक्ष दाखवत आहे, अशी बोचरी टीकाही नितेश राणे यांनी केली.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा