Salman Khan : सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याला ५ कोटी रुपये द्यावे लागतील!

बिष्णोई गँगकडून सलमान खानला धमकी


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली. मात्र बाबा सिद्दीकी यांच्यावर जीवघेणा हल्लानंतर आता लॉरेन्स बिष्णोई गँगने (Lawrence Bishnoi) पुन्हा एकदा सलमान खानला (Salman Khan) धमकी दिली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काळवीट हत्येप्रकरणी ताणला गेलेला वाद गंभीर वळणावर पोहोचला आहे. बिष्णोई गँग आणि या गँगशी संबंधित असणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असताना लॉरेन्स बिष्णोई गँगच्या एका जवळील व्यक्तीने मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संदेशाच्या माध्यमातून सलमान खानला धमकी दिली आहे.



धमकीच्या मेसेजमध्ये काय म्हटले?


मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक धमकीचा मेसेज आला. यामध्ये लॉरेन्स बिष्णोईशी असलेले वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसेच त्याने पैसे दिले नाही तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल असा इशारा दिला आहे.


दरम्यान, मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर संरक्षण यंत्रणाही आता अधिकच सतर्क झाली आहे.

Comments
Add Comment

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी

Malnourished children : तीव्र कुपोषित बालकांचा घसरला आलेख

प्रशासनाच्या प्रयत्नांना यश पालघर: कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्ह्याचे

Corridor : विरार-अलिबाग मार्गिकेचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात; कोकण विकासाला मिळणार चालना

मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'विरार-अलिबाग बहुउद्देशीय

Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

 राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे