BMC Job : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! मिळणार भरघोस पगार

  151

'असा' करा अर्ज


मुंबई : सध्या अनेकाजण भरघोस पगारासह सरकारी नोकरीच्या शोधात असतात. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने रिक्त पदांसाठी भरती जारी केली आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांना बीएमसीच्या अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज करावा लागणार आहे. तसेच या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार आहे. तर २ डिसेंबर २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.



कोणत्या पदांसाठी असणार भरती?


बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण ६९० रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनियर), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल),तसेच सेकंडरी इंजिनियर ( सिव्हिल), यांत्रिकी आणि विद्युत इंजिनियर (Mechanical And Electrical Engineer) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी वेगवेगळे वेतन देण्यात येणार आहे.



वयोमर्यादा आणि वेतन


बृहन्मुंबई महानगरपालिकेतील या नोकरीसाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. ज्युनिअर इंजिनियर पदासाठी ४१८००० ते १३२३३०० रुपये वेतन मिळणार आहे. तर सेकंडरी इंजिनियर पदासाठी ४४९०० ते १४२४०० रुपये वेतन मिळणार आहे.



शैक्षणिक पात्रता


सिव्हिल इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजीमध्ये इंजिनियरिंग डिप्लोमा केला असावा. तसेच इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनियर पदासाठी उमेदवाराने इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्टशन इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा.

Comments
Add Comment

पहिल्या यादीत ६ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचा अकरावीत प्रवेश

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना उलटला तरीही राज्यातील विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळाला नव्हता.

'समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, परंतु हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत'

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सरकारला इशारा मुंबई : राज्य सरकारने त्रिभाषा संदर्भातील दोन जीआर रद्द केले आहेत.

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास, विद्यार्थी हितासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती - मुख्यमंत्री

पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६०० कोटी मंजूर मुंबई : राज्यात सर्व

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिकांचा रंग हवा पांढरा

अन्य रंगांच्या पत्रिका असल्यास त्वरीत बदलाव्या लागणार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यरत कर्मचारी

पाच तारखेचा मोर्चा निघणार नाही, सर्वपक्षीय नेत्यांचा निर्णय

मुंबई : मागील सरकारमध्ये उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री असताना हिंदी भाषा सक्तीकरणाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे

कुठल्या तोंडाने आंदोलन करता, शासनाचे दोन्ही जीआर रद्द; फडणवीसांची घोषणा

मुंबई : राज्यात हिंदी भाषेला विरुध्द करण्यासाठी राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर