Dharavi Redevelopment Dispute : “…बुद्धिमान खोटारडे आदित्य ठाकरे”, 'या' भाजप नेत्याने केली बोचरी टीका

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होताच आता अनेक नेते एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करताना दिसत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackerey) आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) हे दोघे आमनेसामने आले आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. आता या टीकेला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिल आहे. “आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत. तुम्ही या”, असे आवाहन आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे.


धारावी पुनर्विकास योजनेवरुन आदित्य ठाकरेंनी भाजपवर जोरदार आरोप केले आहे. धारावीत ३०० एकर पुनर्विकासाच टेंडर अदानीला दिलंय. मुंबईमधील तुमची आमची जमीन अदानीला फुकटात दिलीय. मढ, कुर्ला, देवनार येथील जमिन अदानींना दिली आहे. मुंबईमधली एकूण १०८० एकर जमीन फुकटात अदानींच्या घशात घातलीय, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. आता आशिष शेलार यांनी या आरोपावर चांगलच प्रत्युत्तर दिले आहे.


आशिष शेलार यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी १०८० एकर आकडा आला कुठून? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यासोबतच आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत.. तुम्ही या, असे मोठं आवाहनसुद्धा दिलं आहे.



आशिष शेलार काय म्हणाले?


बुद्धिमान खोटारडे आदित्य ठाकरे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या.. खोटं बोलून पळ काढू नका !


◆1080 एकर आकडा आला कुठून ?


◆अदानीच्‍या नावावर 1080 एकर जागा चढली, सरकारने दिली याबाबत शासकीय कागद, कॅबिनेट निर्णय दाखवा...


◆उलट धारावीतील नेचर पार्क 37 एकरचा भूखंड हडप करण्याचा डाव आहे की नाही ?


◆उत्तर द्या ! आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत.. तुम्ही या !!


◆नाहीतर पेग्विनची काळजी करीत राणीच्या बागेत बसा !





दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झालंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :

ई-रिक्षां व ई-बाईकसाठीही परमिट (परवाना ) बंधनकारक करण्याचा निर्णय -- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित

Railway LPG Shortage : इंधन संकटाचा रेल्वे खानपान सेवेला फटका; वडापाव-समोसे मेन्यूमधून गायब होणार?

मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक

येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित

स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदी यामिनी जाधव, उपनगरे समिती अध्यक्षपदी संगिता शर्मा यांची निवड

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव तर उपाध्यक्षपदी

महापालिका शाळांमध्ये पोषक आहार अद्याप तरी सुरळीतच; संस्थांना सिलिंडर पुरवण्यासाठी रेशनिंग कंट्रोलला महापालिका प्रशासनाच्या सूचना

मुंबई: मुंबईत इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महापालिका शाळांमध्ये गॅस सिलिंडरमुळे मुलांच्या तोंडची खिचडी