Nitesh Rane : काँग्रेसच्या कोठीवर नाचणाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलण्याची हिंमत करु नये!

आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना फटकारले


मुंबई : संजय राजाराम राऊतसारख्या (Sanjay Raut) बिकाऊ माणसाने भाजपा पक्ष मदारी आणि इतर सर्व माकडं आहेत, असं वक्तव्य करण्याआधी स्वत:च्या बुडाखाली काय आग लागली आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. उबाठाला (UBT) एका-एका जागेसाठी दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसच्या कोठीवर मुजरे करावे लागतात, नाक रगडायला लागतं तरीही काँग्रेस यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कोठीवर नाचणाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलण्याची हिंमत करु नये, असा घणाघात भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतवर केला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत टीका केली.



त्याग आणि उद्धव ठाकरेचं काहीच समीकरण नाही


दुसऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करणं, हिंदुत्व या विषयावर तडजोड करणं, स्वत:ची घरे मोठी करणं या पलीकडे जाऊन संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाने म्हणजेच उद्धव ठाकरेने काहीच केलं नाही. त्याग आणि उद्धव ठाकरेचं काहीच समीकरण नसल्यामुळे भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंदुत्ववादी सरकार आणण्यासाठी व बाळासाहेबांच्या विचारांसाठी केलेला त्याग संजय राऊतसारख्या भ्रष्टाचारी माणसाला कधीच कळणार नाही, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतला फटकारले.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा