Mumbai Fire : अंधेरीत अग्नितांडव! लोखंडवाला परिसरातील इमारतीला भीषण आग

तिघांचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची शक्यता


मुंबई : दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील एनआर कॉम्प्लेक्समधील इमारतीच्या १७व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली होती. मुंबईतील आगीचे प्रकरण ज्वलंत असताना आता मुंबईतल्या अंधेरीतील लोखंडवाला (Lokhandwala) परिसरात एका इमारतीला भीषण आग (Fire News) लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. लोखंडवाला परिसरातील एका इमारतीत दहाव्या मजल्यावरील एका घरात आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे या आगीत घरात राहणारे दोन वृद्ध आणि घरातील नोकराचा मृत्यू झाला.


दरम्याम, या आगीत काही जण अडक्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच आग लागण्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. परंतु पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२