Mumbai Fire : अंधेरीत अग्नितांडव! लोखंडवाला परिसरातील इमारतीला भीषण आग

तिघांचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची शक्यता


मुंबई : दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील एनआर कॉम्प्लेक्समधील इमारतीच्या १७व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली होती. मुंबईतील आगीचे प्रकरण ज्वलंत असताना आता मुंबईतल्या अंधेरीतील लोखंडवाला (Lokhandwala) परिसरात एका इमारतीला भीषण आग (Fire News) लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. लोखंडवाला परिसरातील एका इमारतीत दहाव्या मजल्यावरील एका घरात आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे या आगीत घरात राहणारे दोन वृद्ध आणि घरातील नोकराचा मृत्यू झाला.


दरम्याम, या आगीत काही जण अडक्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच आग लागण्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. परंतु पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे