Mumbai Fire : अंधेरीत अग्नितांडव! लोखंडवाला परिसरातील इमारतीला भीषण आग

तिघांचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची शक्यता


मुंबई : दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील एनआर कॉम्प्लेक्समधील इमारतीच्या १७व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली होती. मुंबईतील आगीचे प्रकरण ज्वलंत असताना आता मुंबईतल्या अंधेरीतील लोखंडवाला (Lokhandwala) परिसरात एका इमारतीला भीषण आग (Fire News) लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. लोखंडवाला परिसरातील एका इमारतीत दहाव्या मजल्यावरील एका घरात आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे या आगीत घरात राहणारे दोन वृद्ध आणि घरातील नोकराचा मृत्यू झाला.


दरम्याम, या आगीत काही जण अडक्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच आग लागण्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. परंतु पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला