अभिनेते अतुल परचुरे अनंतात विलीन; मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी साश्रूनयनांनी दिला निरोप

  73

मुंबई : नाटक असो वा मालिका सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांचे काल निधन झाले. मंगळवारी दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. आपल्या लाडक्या मित्राला शेवटचा निरोप देताना सर्वच भावुक झाले.


अतुल परचुरे पाच दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांची तब्येत बिघडली होती. वर्षभरापूर्वीच कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करत ते बरे झाले होते. नव्या जोमाने कामालाही लागले होते. मात्र इतर आजाराने पुन्हा डोके वर काढले. शरिराने साथ दिली नाही आणि सोमवारी त्यांच्या निधनाची दु:खद बातमी आली.


मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव दादर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर दुपारी दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार सगळेच भावुक झाले.


अतुल परचुरे हे मराठी सिनेमा, रंगभूमी, मालिका सर्वच व्यासपिठावर लोकप्रिय असल्याने त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक नावाजलेले कलावंत स्मशानभूमीत रडताना पहावयास मिळाले. अनेकांना शोकसंदेश देण्यासाठीही शब्द फुटत नव्हते.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र