बाजारात जाण्यावरून झालेल्या वादातून मुलाने केला आईचा खून

  105

कुडाळ : बाजारात जाण्यावरून आई आणि मुलामध्ये झालेल्या वादात संतापाच्या भरात नराधन मुलाने आईचा गळा आवळून खून केला. ही दुर्दैवी घटना कुडाळ तालुक्यातील कसाल बौद्धवाडी येथे सोमवारी रात्री घडली.


याप्रकरणी सुरेंद्र मोहन कदम (वय ४०) याच्यावर स्वतःची आई मनोरमा मोहन कदम (वय ५८) हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले असल्याचे सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी सांगितले.


आईचा खून केल्यानंतर बॅग भरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.


बाजारात जाण्यावरून झालेल्या वादातून त्याने आईला सुरुवातीला हाताने मारहाण केली. मात्र घरातून पळून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या आईला घराबाहेर पकडून दोरीच्या सहाय्याने गळा दाबून खून केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत सिंधुदुर्ग नगरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


याबाबतची फिर्याद सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याचे पोलीस शैलेश सोनसुरकर यांनी दिली. त्यानुसार संशयीत सुरेंद्र मोहन कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली विहिरीचे पाणी काढण्यासाठी असलेली दोरी जप्त करण्यात आली आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात ते आठच्या सुमारास ही घटना कसाल बौद्धवाडी येथील आंब्याचे झाडाखाली घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी