Mumbai Crime : मुंबईत ९,६९० ग्रॅम अफू जप्त, चौघांना अटक

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे अफूचा मोठा साठा यशस्वीरित्या जप्त (opium seized) केला. या टोल नाक्यावर अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या ट्रकची ओळख पटवण्यात आली. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS) कायदा, १९८५ च्या तरतुदीनुसार एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात वाहनाची कसून झडती घेतल्यानंतर ९,६९० ग्रॅम अफू जप्त करण्यात आला. राष्ट्रीय औषध कायदा अंमलबजावणी विभागाच्या अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या (NDPS) फील्ड टेस्ट किटच्या चाचणीद्वारे या पदार्थाची पुष्टी करण्यात आली.

तपासाचा एक भाग म्हणून, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी या अंमली पदार्थाचा मुंबईतील प्राप्तकर्ता आणि रतलाममधील पुरवठादार या पुरवठा साखळीत सामील असलेल्या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये अफूची बेकायदेशीररीत्या लागवड करणाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा

मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपचे आंदोलन

निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा 'मविआ' चा कट उधळून लावा – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई: आगामी

वेध निवडणुकीचा : कलिना आणि वांद्रे पूर्व भाजपसाठी अनुकूल; २० ते २२ नगरसेवक निवडून येतील

उत्तर मध्य भाजप जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास सचिन धानजी मुंबई : मुंबई उत्तर मध्य

मुंबईत राजकीय रणकंदन पेटले! विरोधकांच्या ‘सत्याचा मोर्चा’ला भाजपचे 'मूक आंदोलन' करत जशास तसे प्रत्युत्तर

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादीतील मोठ्या गोंधळावर आक्षेप घेत, आज (दि. १) मुंबईत महाविकास