IPL 2025 : आयपीएल २०२५ आधीच मुंबई इंडियन्सला मिळणार नवे प्रशिक्षक!

एमआयने घेतला मोठा निर्णय 'यांस' मिळाली संधी


नवी दिल्ली : आयपीएल २०२५ (IPL 2025) पूर्वी अनेक संघांमध्ये मोठे बदल घडताना पाहायला मिळू शकते. यंदाच्या आयपीएलपूर्वी काही संघांनी आपल्या संघाचा प्रशिक्षक वर्ग बदलला आहे, तर होणाऱ्या लिलावापूर्वी संघ चांगलीच तयारी करत आहे. आता चॅम्पियन संघ म्हणून ओळख असलेल्या मुंबई इंडियन्सनेही (Mumbai Indians) नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. आयपीएल २०२५ पूर्वी आयपीएलचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सने मोठी घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सने नव्या खेळाडूचा संघाचा प्रशिक्षक म्हणून घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सने मार्क बाऊचरच्या जागी व्हीडिओ शेअर करत नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने याची संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. महेला जयवर्धने यापूर्वीही गेली अनेक वर्षे मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. आता पुन्हा एकदा त्याला आयपीएल २०२५ साठी संघात सामील केले आहे. याची घोषणा मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट करत केली आहे.


मार्क बाउचर २०२३ आणि २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक होते. मात्र आता त्याची जागा जयवर्धने घेणार आहे. जयवर्धनेचा प्रशिक्षक म्हणून चांगला रेकॉर्ड आहे. जयवर्धनेच्या उपस्थितीत मुंबईने तीन विजेतेपद पटकावले. या संघाने २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. मुंबईने आतापर्यंत पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. २०२२ मध्ये मुंबईने जयवर्धनेकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्याला क्रिकेटचे ग्लोबल हेड बनवण्यात आले. या काळात त्याने महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सलाही मदत केली. तो MLC आणि MIE साठी देखील महत्त्वपूर्ण कामगिरी करताना दिसला.



मुंबई इंडियन्ससाठी २०२४ चा सीझन खूपच खराब


आयपीएल २०२४ मुंबईसाठी खूप वाईट होते. मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी हार्दिक पंड्याच्या खांद्यावर दिली गेली. गुणतालिकेत संघ तळाच्या स्थानावर होता. मुंबईने या मोसमात एकूण १४ सामने खेळले आणि केवळ ४ सामने जिंकले. एमआयला १० सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईच्या संघात अनेक मोठे खेळाडू होते. पण तरीही संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Comments
Add Comment

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार

Sabarimala Temple Case : सबरीमला मंदिर प्रवेश प्रकरणात केंद्र सरकारने मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले...

केरळमधील सबरीमला मंदिराबाबत (Sabarimala Temple Case) केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली. केंद्र

Lashkar-e-Taiba : श्रीनगर पोलिसांची मोठी कारवाई; पोलिसांकडून लष्कर-ए-तैयबा नेटवर्कचा भंडाफोड

- दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह पाच जणांना अटक श्रीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी

Air India: एअर इंडियाचा प्रवास ८ एप्रिलपासून महाग होणार; जाणून घ्या किती खर्च येणार?

नवी दिल्ली: टाटा ग्रुपच्या मालकीच्या एअर इंडियाने प्रवाशांना मोठा धक्का दिला आहे. जर तुम्हीही एअर इंडियाने