Baba Siddiqui Murder : लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी!

मुंबई : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांची गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली. या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेबाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर नेमकी हत्या कोणी व का केली असे याबाबतची चर्चा सुरु होती. परंतु आता या चर्चांना पुर्णविराम मिळालं आहे.


बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगने (Lawrence Bishnoi Group) जबाबदारी स्वीकारली असून पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर याप्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख देखील पटल्याची माहिती मिळत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारत सोशल मीडियावर 'बाबा सिद्दिकी यांची हत्या आम्ही केली' असा हिंदी भाषेत मजकूर पोस्ट शेअर केली आहे.



लॉरेन्स बिश्नोई गँगने पोस्टमध्ये काय म्हटले?


देह आणि संपत्ती हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. आजपर्यंत मी फक्त सत्कर्म केले, कायम मैत्रीचे कर्तव्य मी पाळले. सलमान खान आम्हाला हे सगळे नको होते, पण तुम्ही आमच्या भावाला त्रास दिला. आज जो बाबा सिद्दिकी सभ्य, मनमिळवू आणि स्वच्छ प्रतिमा असल्याचे दाखवत आहे तो एकेकाळी त्याच्यावर मोक्का लागला होता. बाबा सिद्दिकीच्या हत्येचे कारण अनुज थापन आणि दाऊदचे बॉलीवूड, राजकारणी लोकांशी करत असलेले डिलींग हेच आहे. आमची कोणाशीच वैयक्तिक वैर नाही पण जो कोणी सलमान खान आणि दाऊदची मदर करेल त्याला हिशोब आम्हाला ठेवावा लागेल. आमच्या कोणत्याही भावाला जर तुम्ही मारले तर आम्ही उत्तर देणारच, आम्ही कधीच पहिला वार केला नाही, जय श्री राम.


Comments
Add Comment

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त

राज्य शासनाकडे पालिकेची ११ हजार कोटींची थकबाकी

वसुलीसाठी नेमलेली समिती कागदावरच? मुंबई : मुंबईतील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी उद्यापासून राज्यभर धडक मोहीम; परिवहन मंत्र्यांचे आदेश

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई मुंबई  : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे