Baba Siddiqui Murder : लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी!

मुंबई : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांची गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली. या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेबाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर नेमकी हत्या कोणी व का केली असे याबाबतची चर्चा सुरु होती. परंतु आता या चर्चांना पुर्णविराम मिळालं आहे.


बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगने (Lawrence Bishnoi Group) जबाबदारी स्वीकारली असून पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर याप्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख देखील पटल्याची माहिती मिळत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारत सोशल मीडियावर 'बाबा सिद्दिकी यांची हत्या आम्ही केली' असा हिंदी भाषेत मजकूर पोस्ट शेअर केली आहे.



लॉरेन्स बिश्नोई गँगने पोस्टमध्ये काय म्हटले?


देह आणि संपत्ती हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. आजपर्यंत मी फक्त सत्कर्म केले, कायम मैत्रीचे कर्तव्य मी पाळले. सलमान खान आम्हाला हे सगळे नको होते, पण तुम्ही आमच्या भावाला त्रास दिला. आज जो बाबा सिद्दिकी सभ्य, मनमिळवू आणि स्वच्छ प्रतिमा असल्याचे दाखवत आहे तो एकेकाळी त्याच्यावर मोक्का लागला होता. बाबा सिद्दिकीच्या हत्येचे कारण अनुज थापन आणि दाऊदचे बॉलीवूड, राजकारणी लोकांशी करत असलेले डिलींग हेच आहे. आमची कोणाशीच वैयक्तिक वैर नाही पण जो कोणी सलमान खान आणि दाऊदची मदर करेल त्याला हिशोब आम्हाला ठेवावा लागेल. आमच्या कोणत्याही भावाला जर तुम्ही मारले तर आम्ही उत्तर देणारच, आम्ही कधीच पहिला वार केला नाही, जय श्री राम.


Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात