Baba Siddiqui Murder : लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी!

  120

मुंबई : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांची गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली. या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेबाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर नेमकी हत्या कोणी व का केली असे याबाबतची चर्चा सुरु होती. परंतु आता या चर्चांना पुर्णविराम मिळालं आहे.


बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगने (Lawrence Bishnoi Group) जबाबदारी स्वीकारली असून पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर याप्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख देखील पटल्याची माहिती मिळत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारत सोशल मीडियावर 'बाबा सिद्दिकी यांची हत्या आम्ही केली' असा हिंदी भाषेत मजकूर पोस्ट शेअर केली आहे.



लॉरेन्स बिश्नोई गँगने पोस्टमध्ये काय म्हटले?


देह आणि संपत्ती हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. आजपर्यंत मी फक्त सत्कर्म केले, कायम मैत्रीचे कर्तव्य मी पाळले. सलमान खान आम्हाला हे सगळे नको होते, पण तुम्ही आमच्या भावाला त्रास दिला. आज जो बाबा सिद्दिकी सभ्य, मनमिळवू आणि स्वच्छ प्रतिमा असल्याचे दाखवत आहे तो एकेकाळी त्याच्यावर मोक्का लागला होता. बाबा सिद्दिकीच्या हत्येचे कारण अनुज थापन आणि दाऊदचे बॉलीवूड, राजकारणी लोकांशी करत असलेले डिलींग हेच आहे. आमची कोणाशीच वैयक्तिक वैर नाही पण जो कोणी सलमान खान आणि दाऊदची मदर करेल त्याला हिशोब आम्हाला ठेवावा लागेल. आमच्या कोणत्याही भावाला जर तुम्ही मारले तर आम्ही उत्तर देणारच, आम्ही कधीच पहिला वार केला नाही, जय श्री राम.


Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.