Ratnagiri News : स्वप्नाच्या पुढे नियतीचा खेळ! वैष्णवी मानेची ह्दयद्रावक घटना

नवरात्रोत्सवात गरबा खेळताना चक्कर आली, अन्...


रत्नागिरी : प्रत्येकाचे काहीना काही मोठं करायचे स्वप्न असते. मात्र स्वप्नाच्या पुढे नियती तिचा कोणता खेळ मांडेल हे कोणालाही ठाऊक नसते. अशीच एक घटना कोकनातील रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील सर्वात हुशार आणि प्रत्येक गोष्टीत प्रथम स्थानी असणाऱ्या वैष्णवी प्रकाश माने (१६) या विद्यार्थिनीला गरबा खेळताना चक्कर आली आणि यामध्ये तिचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ऐन सणासुदीच्या काळात दुर्दैवी घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून वैष्णवीच्या कुटुंबावरही दु:खाचे डोंगर पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसारा, वैष्णवी माने हिचा नवरात्रोत्सवातच दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. सरस्वती पूजनावेळी सुरू असलेल्या गरबा कार्यक्रमात ही दुर्दैवी घटना घडली.



निष्ठूर नियतीच्या खेळामुळे स्वप्न अधुरं


रत्नागिरीमधील आजीवली हायस्कूल मध्ये तिने ८६ टक्के गुण मिळवून तिने पहिला क्रमांक पटकवला होता. इंजिनिअरिंग करण्याचे वैष्णवीचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. दहावीमध्ये उत्तम मार्क मिळाल्यानंतर तिला एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अॅडमिशनही मिळाले होते. मात्र आई-वडिलांची आठवण येत असल्याने तिने अॅडमिशन मिळालेलं हायस्कूल सोडून पुन्हा पाचल येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. हायस्कूलप्रमाणे या महाविद्यालयातही वैष्णवीने अभ्यासातील गुणवत्ता, उत्तम वक्तृत्व शैली, खेळातील आवड यामुळे शाळेतील गुरुजनांची मन जिंकली होती. मात्र वैष्णवी हिला गरबा खेळताना चक्कर आली आणि ती तिचा यातच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे वैष्णवीचे लहानपणीचे स्वप्न भंग झाले, अशी माहिती वैष्णवीच्या शिक्षकांनी दिली.



वैष्णवीचा शिक्षणासाठीचा प्रवास


राजापूर पाचल येथील महाविद्यालयात शिकणारी वैष्णवी ही आजीवली या आपल्या गावातून धनगर वाडीतून तब्बल दोन किलोमीटर पायपीट करून एसटी स्टॉपपर्यंत रोज येत होती. नंतर त्यापुढे दररोज एक तास एसटीने प्रवास करून पाचल येथे हायस्कूलमध्ये जात होती. या घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अजूनही शिक्षणासाठी पायपीट करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि

Jalgaon News : नदीत बुडणाऱ्या लेकाला वाचवण्यासाठी बाप धावला पण नियतीनं बापालाच हिरावलं , मुलगाही बेपत्ता

Jalgaon News : जळगावमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडके गावातील पिता-पुत्र

Jalgaon : खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! जबलपूर-कोयंबतूर विशेष गाडी आता नियमित धावणार

Jalgaon : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, जबलपूर-कोयंबतूर मार्गावर धावणाऱ्या

Tuljapur News : आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबरपासून; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम पत्रिका आणि धार्मिक विधी

तुळजापूर: महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या

Smart Ration Card : स्मार्ट रेशन कार्ड वाटप सुरू; QR कोड असलेल्या अत्याधुनिक कार्डाची वैशिष्ट्ये आणि प्रक्रिया

महाराष्ट्रातील शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी असून, पारंपारिक कागदी रेशन कार्डऐवजी आता QR कोड