Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव मैदानात उतरणार! २४ वर्षांनंतर होणार टीम इंडियाचा कर्णधार

मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) २४ वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व करणार (Captain) आहे. सचिनला इंटरनॅशनल मास्टर्स लीगमध्ये (International Masters League) टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह उसळला आहे. या विशेष लीगची सुरुवात १७ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये (DY Patil Stadium) भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे.


२००० साली सचिनने शेवटचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर कर्णधारपद सौरव गांगुलीकडे सोपवल्यानंतर, आता तब्बल दोन दशकांनंतर सचिन पुन्हा भारतीय टीमचं नेतृत्त्व करणार आहे. त्याच्यासाठी आणि चाहत्यांसाठी ही मोठी संधी आहे कारण सचिनला पुन्हा एकदा मैदानावर नेतृत्व करताना पाहण्याचा आनंद मिळणार आहे. लीगमध्ये भारतासह प्रमुख देशांचे संघ सहभागी होणार आहेत.


श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व कुमार संगकारा करणार असून, ऑस्ट्रेलियाकडून शेन वॉटसन, दक्षिण आफ्रिकेकडून जॅक कॅलिस, इंग्लंडकडून इयॉन मॉर्गन आणि वेस्ट इंडिजकडून ब्रायन लारा कर्णधारपद सांभाळणार आहेत. भारतात होणाऱ्या या लीगमध्ये अनुभवसंपन्न खेळाडू पुन्हा एकदा आपल्या कौशल्यांचा जलवा दाखवणार आहेत. इंटरनॅशनल मास्टर्स लीग ही क्रिकेटप्रेमींसाठी अनोखी पर्वणी ठरणार आहे. त्यात विश्वचषक विजेते, महान फलंदाज आणि अनुभवी कर्णधार पुन्हा एकदा एकत्र येऊन आपलं कौशल्य दाखवणार आहेत.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत