Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव मैदानात उतरणार! २४ वर्षांनंतर होणार टीम इंडियाचा कर्णधार

मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) २४ वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व करणार (Captain) आहे. सचिनला इंटरनॅशनल मास्टर्स लीगमध्ये (International Masters League) टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह उसळला आहे. या विशेष लीगची सुरुवात १७ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये (DY Patil Stadium) भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे.


२००० साली सचिनने शेवटचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर कर्णधारपद सौरव गांगुलीकडे सोपवल्यानंतर, आता तब्बल दोन दशकांनंतर सचिन पुन्हा भारतीय टीमचं नेतृत्त्व करणार आहे. त्याच्यासाठी आणि चाहत्यांसाठी ही मोठी संधी आहे कारण सचिनला पुन्हा एकदा मैदानावर नेतृत्व करताना पाहण्याचा आनंद मिळणार आहे. लीगमध्ये भारतासह प्रमुख देशांचे संघ सहभागी होणार आहेत.


श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व कुमार संगकारा करणार असून, ऑस्ट्रेलियाकडून शेन वॉटसन, दक्षिण आफ्रिकेकडून जॅक कॅलिस, इंग्लंडकडून इयॉन मॉर्गन आणि वेस्ट इंडिजकडून ब्रायन लारा कर्णधारपद सांभाळणार आहेत. भारतात होणाऱ्या या लीगमध्ये अनुभवसंपन्न खेळाडू पुन्हा एकदा आपल्या कौशल्यांचा जलवा दाखवणार आहेत. इंटरनॅशनल मास्टर्स लीग ही क्रिकेटप्रेमींसाठी अनोखी पर्वणी ठरणार आहे. त्यात विश्वचषक विजेते, महान फलंदाज आणि अनुभवी कर्णधार पुन्हा एकदा एकत्र येऊन आपलं कौशल्य दाखवणार आहेत.

Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील