आईने दुसरे लग्न केल्याने आठ वर्षीय मुलाची आत्महत्या

भाईंदर : पहिल्या पतीपासुन झालेल्या मुलाचा विचार न करता त्याला अनाथ आश्रमात टाकून पहिला नवऱ्याच्या निधनानंतर दुसरे लग्न करून संसार थाटलेल्या आईचा विरह सहन न झाल्याने तणावग्रस्त अवस्थेत असलेल्या आठ वर्षीय मुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना भाईंदर येथे घडली आहे.


पहिल्या पतीच्या निधनानंतर दुसरे लग्न करून पहिल्या पतीपासुन झालेल्या आठ वर्षीय मुलाला भाईंदर येथिल केअरींग हँड्स सेवा कुटीर या संस्थेत ठेवण्यात आले होते. गेल्या महिन्यातच मुलाची आई त्याला भेटायला आली होती. तेव्हा त्याने मला येथे राहायचे नाही तू मला घेऊन चल असा तगादा लावला होता. संस्थेच्या लोकांना सुध्दा तो असेच सांगत असे. परंतू आईने असमर्थता दाखवली होती. त्यामुळे मुलाला प्रचंड नैराश्य आले होते.


मंगळवारी रात्री सर्वजण झोपल्यानंतर त्याने आश्रमातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सकाळी जेव्हा संस्थेचे कर्मचारी व मुले उठली तेव्हा एक मुलगा कमी असल्याने शोधाशोध सुरू झाली आणि सदर प्रकार उघडकीस आला.


संस्थेने उत्तन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठविला असता शवविच्छेदन अहवालात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मुलाच्या आईला संपर्क करून माहिती देऊन सायंकाळी मृतदेह आईकडे सोपवण्यात आला.

Comments
Add Comment

Davkhare : गावदेवी भाजी मंडई आग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, आमदार डावखरेंची मागणी

Thane : ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गजबजलेल्या गावदेवी भाजी मंडईमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून

Prasad Lad : प्रसाद लाड यांनी स्वीकारले जरांगे पाटील यांचे चर्चेचे निमंत्रण; उद्या आंतरवलीत भेट

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?; २३ मे च्या 'डेडलाईन'पूर्वी सरकारच्या वतीने मध्यस्थी मुंबई : मराठा आरक्षणाच्या

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

पक्षसंघटनेची एकजुटीने मजबूत बांधणी करणार

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा निर्धार मुंबई; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाले आहेत.

BCCI : निवड समितीचा मोठा निर्णय! भारत अ संघात अचानक बदल; या ऑलराउंडरला मिळाली संधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारत A संघात मोठा बदल केला आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यातील ट्राय