दैनिक प्रहार मुंबई आवृत्तीचा १६ वा वर्धापन दिन उत्साहात

एमआयजी क्लबचे चेअरमन मोहन नागपूरकर व जनरल सेक्रेटरी श्रीकांत शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई : दैनिक प्रहार (Prahaar) मुंबई आवृत्तीचा १६ वा वर्धापन दिन आज प्रहार कार्यालयात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास वांद्रे येथील प्रसिध्द अशा एमआयजी क्लबचे चेअरमन मोहन नागपूरकर व जनरल सेक्रेटरी श्रीकांत शेट्टी दैनिक प्रहारच्या चमूला शुभेच्छा देण्यासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. महाव्यवस्थापक व राणे प्रकाशनचे मुद्रक-प्रकाशक मनीष राणे, एच.आर.लेखा प्रशासक, वितरण विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत. संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला दैनिक प्रहार समूहाचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.



दैनिक प्रहारच्या मुंबई आवृत्तीचा १६ वा वर्धापन दिन आज दैनिक प्रहारच्या मुंबई कार्यालयात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहन नागपूरकर यांनी दैनिक प्रहारच्या वाटचालीस शुभेच्छा देताना माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत आलेले त्यांचे अनुभव कथन केले. तसेच नारायण राणे यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्याच्या त्यांच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक केले. माणूस आपली प्रगती कशा प्रकारे साध्य करू शकतो, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे नारायण राणे असे सांगत प्रत्येकाने त्यांच्याकडून बरेच काही शिकून आपली प्रगती कशी करता येईल, हे पाहावे असे सांगत मार्गदर्शन केले.


आजच्या पत्रकारितेबद्दल बोलताना ते म्हणाले की, आजची पत्रकारिता सोपी नाही. पत्रकारांना कुठे कधीही जावे लागते. त्यात बऱ्याचदा त्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो. त्यात रोज नवनवीन तंत्रज्ञान येत असून, ते शिकून घेणे गरजेचे असून कोणतेही कामे टीमवर्कनेच होते. तसेच कोणतेही काम कमीपणाचे नसून दिलेले काम कसे अचूक करता येईल, हे पहावे व यशस्वी व्हावे असेही ते म्हणाले.


तर एमआयजी क्लबचे जनरल सेक्रेटरी श्रीकांत शेट्टी यांनी एमआयजी क्लब मधील विविध उपक्रमांची माहिती विशद केली. तसेच खेळाडूंपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत व राजकारण्यांपासून त्यांच्या हौशी कार्यकर्त्यांकडून आलेले विविध अनुभव कथन केले.


महाव्यवस्थापक व राणे प्रकाशनचे मुद्रक प्रकाशक मनीष राणे यांनी पाहुण्यांचे प्रहार समुहातर्फे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. दैनिक प्रहारच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. तर प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. एच आर, लेखा, प्रशासन व वितरण विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत यांनी आभार मानले.



पालकांनी मुलांना आनंदी कसे जगावे याचे मार्गदर्शन करावे!

हल्ली पालक आपल्या मुलांना डॉक्टर हो, इंजिनियर हो, संगणक तंत्रज्ञ हो, क्रिकेटर हो, असा तगादा लावतात; मात्र जीवनात काहीही कर व आनंदी हो,असे आज सांगण्याची गरज असल्याचे मोहन नागपूरकर यांनी सांगितले. जीवनात आनंदी राहणे हे महत्त्वाचे असून, आपण करत असलेल्या कोणत्याही कामात आनंदी राहणे खूप महत्त्वाचे असून, असा विचार करणारे पालक निर्माण होण्याची गरज आहे असे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Food Poisoning : मुंबईत धक्कादायक प्रकार! 'आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं...'; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील पायधूनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा

Mumbai-Bhopal Flight Accident : मुंबई ते भोपाळ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक घटना या समोर येत आहेत. अहमदाबादची एक भयंकर मोठी विमान दुर्घटनेच्या आठवणी आजही

Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सोमवार, २७ एप्रिल रोजी पहाटे मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात घडला असून यात तिघांचा मृत्यू झाला

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील

Malad BMC School : मालाड पश्चिममधील अतिधोकादायक नेमाणी शाळेत शिकतात महापालिकेची मुले

- भाजप नगरसेविकेने शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा बंद करण्याची केली मागणी - पर्यायी शाळा लिबर्टी गार्डन शाळेत सुरु

BMC News : महापालिकेच्या स्टॉल्सचा परवाना अविवाहित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांच्या नावे होणार

- भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने दर्शवला ठाम नकार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेचे स्टॉल्स