Vegetables Price Hike : व्हेज थाली महागली! खवय्यांना द्यावे लागतात अधिकचे पैसे

मुंबई : सध्या कांदे, बटाटे, टोमॅटोचे (Vegetables Price Hike) भाव वाढले आहेत. याचा फटका शाकाहारावर झाला असून हॉटल्समधल्या शाकाहारी थाळ्यांमध्ये वाढ झाली आहे. सामान्यतः मांसाहारी थाळीची किंमत शाकाहारापेक्षा दुप्पट असते, मात्र सप्टेंबर महिन्यात याचे चित्र उलटे दिसून आले. कांदे, बटाटे व टोमॅटोच्या वाढलेल्या किमतींमुळे घरगुती बनवलेल्या चिकनपेक्षा अधिक, शाकाहारी थाळीची (Veg Food Plate) सरासरी किंमत ११ टक्क्यांनी वाढली. ब्रॉयलर चिकनच्या किमतीतील घटीने यात हातभार लावला.


नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स’च्या अहवालाने शाकाहार महागण्यामागील कारणांचा वेध घेतला आहे. कांदा आणि बटाट्याची आवक कमी झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये या जिनसांसह, टोमॅटोच्या किमती अनुक्रमे ५३ टक्के, ५० टक्के आणि १८ टक्क्यांनी वाढल्या. मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. वार्षिक तुलनेत नव्हे, तर आधीच्या महिन्याच्या तुलनेतही भाज्यांची दरवाढ ही एकंदर किंमतवाढीस कारणीभूत ठरली आहे.


शाकाहारी थाळीची किंमत सप्टेंबर २०२३ मधील २८.१ रुपयांवरून यंदाच्या सप्टेंबरमध्ये ११ टक्क्यांनी वाढून ३१.३ रुपयांवर गेली आणि आधीच्या ऑगस्टमध्ये ती ३१.२ रुपये होती. थाळीच्या किमतीत ३७ टक्के वाटा असलेल्या भाज्यांच्या किमती वाढल्याने एकंदरीत शाकाहारी थाळी महागली आहे. बरोबरीने डाळींचे उत्पादन घटल्यामुळे त्यांच्या किमतीही वार्षिक तुलनेत १४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या कपातीमुळे इंधनाचे दर ११ टक्क्यांनी घसरले आहेत. मांसाहारी थाळीच्या बाबतीत, ५० टक्के योगदान असलेल्या ब्रॉयलरच्या किमतीत १३ टक्क्यांनी घट झाल्याने त्या थाळीची किंमत वर्षभरात २ टक्क्यांनी घसरून ५९.३ रुपये झाली आहे.

Comments
Add Comment

दोन महिन्यांत राज्यातील सव्वा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

आरोग्य जागर : सिकलसेलपासून कर्करोगापर्यंतच्या मोहिमांना मोठे यश मुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ

राज्यातील अकुशल कामगारांच्या थकीत मजुरीचा प्रश्न सुटला

मनरेगा अंतर्गत १ हजार १६८ कोटींचा निधी मंजूर; होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा श्रमिकांना मोठा दिलासा मुंबई :

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह

आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना आणि मदतीसाठीचे हेल्पलाईन आणि व्हॉटसॲप क्रमांक

मुंबई : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेतील महत्वपूर्ण पाऊल

मुंबई : युवकांचा देश असलेल्या भारतातील तरुण पिढीमध्ये जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. प्रधानमंत्री