Vegetables Price Hike : व्हेज थाली महागली! खवय्यांना द्यावे लागतात अधिकचे पैसे

मुंबई : सध्या कांदे, बटाटे, टोमॅटोचे (Vegetables Price Hike) भाव वाढले आहेत. याचा फटका शाकाहारावर झाला असून हॉटल्समधल्या शाकाहारी थाळ्यांमध्ये वाढ झाली आहे. सामान्यतः मांसाहारी थाळीची किंमत शाकाहारापेक्षा दुप्पट असते, मात्र सप्टेंबर महिन्यात याचे चित्र उलटे दिसून आले. कांदे, बटाटे व टोमॅटोच्या वाढलेल्या किमतींमुळे घरगुती बनवलेल्या चिकनपेक्षा अधिक, शाकाहारी थाळीची (Veg Food Plate) सरासरी किंमत ११ टक्क्यांनी वाढली. ब्रॉयलर चिकनच्या किमतीतील घटीने यात हातभार लावला.


नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स’च्या अहवालाने शाकाहार महागण्यामागील कारणांचा वेध घेतला आहे. कांदा आणि बटाट्याची आवक कमी झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये या जिनसांसह, टोमॅटोच्या किमती अनुक्रमे ५३ टक्के, ५० टक्के आणि १८ टक्क्यांनी वाढल्या. मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. वार्षिक तुलनेत नव्हे, तर आधीच्या महिन्याच्या तुलनेतही भाज्यांची दरवाढ ही एकंदर किंमतवाढीस कारणीभूत ठरली आहे.


शाकाहारी थाळीची किंमत सप्टेंबर २०२३ मधील २८.१ रुपयांवरून यंदाच्या सप्टेंबरमध्ये ११ टक्क्यांनी वाढून ३१.३ रुपयांवर गेली आणि आधीच्या ऑगस्टमध्ये ती ३१.२ रुपये होती. थाळीच्या किमतीत ३७ टक्के वाटा असलेल्या भाज्यांच्या किमती वाढल्याने एकंदरीत शाकाहारी थाळी महागली आहे. बरोबरीने डाळींचे उत्पादन घटल्यामुळे त्यांच्या किमतीही वार्षिक तुलनेत १४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या कपातीमुळे इंधनाचे दर ११ टक्क्यांनी घसरले आहेत. मांसाहारी थाळीच्या बाबतीत, ५० टक्के योगदान असलेल्या ब्रॉयलरच्या किमतीत १३ टक्क्यांनी घट झाल्याने त्या थाळीची किंमत वर्षभरात २ टक्क्यांनी घसरून ५९.३ रुपये झाली आहे.

Comments
Add Comment

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या