Chembur Fire : मुंबईत अग्नितांडव! चेंबुरमधील एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई : मुंबईमधून (Mumbai News) धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीत एका घरात भीषण आग (Chembur Fire) लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाच घरातील ७ जणांचा मृत्यू झाला असून इतर नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पहाटे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीतील एका घरात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. घरातील सर्व सदस्य झोपेत असताना ही आग लागली. जाग येताच स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. त्यामुळे गुप्ता परिवारातील ७ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.



शिवडीच्या भारत इंडस्ट्रिअल इस्टेटमध्येही भीषण आग


शिवडीच्या (Sewri) भारत इंडस्ट्रिअल इस्टेटमध्येही (Bharat Industrial Estate) आज पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. इंडस्ट्रिअल एस्टेटच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच १० फायर इंजिन आणि १० पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झालेत. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत कोणीही जखमी किंवा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

Comments
Add Comment

ठाणे ते बोरिवली प्रवास होणार अवघ्या १५ मिनिटांत; दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम वेगात

मुंबई : देशातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाला वेग; भांडुप जंक्शनवर एका रात्रीत ४५० टन वजनाचा बसवला स्टील स्पॅन

मुंबई : केवळ एका रात्रीत मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अभियंता पथकाने भांडुप ते सोनापूर

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो होणार सहा डब्यांची; प्रवाशांची होणार गर्दीतून सुटका

३२ अतिरिक्त डबे खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी सुरू मुंबई : मुंबईकरांचा मेट्रो प्रवास आता लवकरच गर्दीमुक्त

आमरण उपोषण मागे; जैन मुनींच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारला १५ दिवसांची मुदत

दादर कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी निलेशचंद्र विजय यांचा निर्वाणीचा इशारा; लोढा-नार्वेकरांची

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायिका म्हणून अविस्मरणीय छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या