Chembur Fire : मुंबईत अग्नितांडव! चेंबुरमधील एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई : मुंबईमधून (Mumbai News) धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीत एका घरात भीषण आग (Chembur Fire) लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाच घरातील ७ जणांचा मृत्यू झाला असून इतर नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पहाटे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीतील एका घरात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. घरातील सर्व सदस्य झोपेत असताना ही आग लागली. जाग येताच स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. त्यामुळे गुप्ता परिवारातील ७ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.



शिवडीच्या भारत इंडस्ट्रिअल इस्टेटमध्येही भीषण आग


शिवडीच्या (Sewri) भारत इंडस्ट्रिअल इस्टेटमध्येही (Bharat Industrial Estate) आज पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. इंडस्ट्रिअल एस्टेटच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच १० फायर इंजिन आणि १० पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झालेत. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत कोणीही जखमी किंवा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला