Chembur Fire : मुंबईत अग्नितांडव! चेंबुरमधील एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू

Share

मुंबई : मुंबईमधून (Mumbai News) धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीत एका घरात भीषण आग (Chembur Fire) लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाच घरातील ७ जणांचा मृत्यू झाला असून इतर नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पहाटे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीतील एका घरात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. घरातील सर्व सदस्य झोपेत असताना ही आग लागली. जाग येताच स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. त्यामुळे गुप्ता परिवारातील ७ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

शिवडीच्या भारत इंडस्ट्रिअल इस्टेटमध्येही भीषण आग

शिवडीच्या (Sewri) भारत इंडस्ट्रिअल इस्टेटमध्येही (Bharat Industrial Estate) आज पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. इंडस्ट्रिअल एस्टेटच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच १० फायर इंजिन आणि १० पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झालेत. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत कोणीही जखमी किंवा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

17 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago