मीरा भाईंदरच्या जुन्या इमारती पुनर्विकासाकरीता नव्या धोरणाला मंजुरी

१९८४ पूर्वीच्या सर्व इमारतींचा पुनर्विकास होणार


भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील ग्रामपंचायत काळात बांधल्या गेलेल्या, मोडकळीस आलेल्या, अनधिकृत घोषित झालेल्या सर्वांनाच नवीन एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावलीनुसार पुनर्बाधणीत चटई क्षेत्रफळ निर्देशांक, जुन्या अधिकृत इमारतींना मिळणारे सर्व फायदे दिले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा १९८४ पूर्वीच्या शहरातील सुमारे ७० टक्के जुन्या अनधिकृत इमारतींना फायदा होणार आहे.


मीरा भाईंदर शहरात ग्रामपंचायत काळात अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत. भाईंदर पूर्व भागातील खारीगाव, गोडदेव, नवघर आदी गावांमधून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारती बांधण्यात आहेत. यातील काही इमारती बांधताना परवानगी घेण्यात आलेली नाही, तर काही इमारतींनी चटई क्षेत्रफळ निर्देशांकांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या सर्व इमारती पुनर्विकासासाठी अनधिकृत ठरल्या आहेत. बहुतांश इमारती मोडकळीस आल्या आहेत, परंतु इमारती अनधिकृत असल्याने अथवा चटई क्षेत्रफळाचा अतिरिक्त वापर झाल्याने त्यांच्या पुनर्बाधणीत विकासकाला अपेक्षित फायदा होत नाही. तसेच इमारतीमधील रहिवाशांनाही अतिरिक्त जागा मिळत नाही. त्यामुळे या सर्व इमारतींचा पुनर्विकास रखडला होता.



आमदार सरनाईकांची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य


नवीन एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावलीनुसार ३० वर्षे जुन्या असलेल्या अधिकृत इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी १५ टक्के प्रोत्साहन भत्ता मंजूर केला असल्याने विकासक व रहिवाशी दोघांचा फायदा होणार आहे. या आदेशानुसार १९८४ पूर्वीच्या सर्व अनधिकृत इमारती आता पुनर्विकासात अधिकृत म्हणून गणल्या जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा शहरातील सुमारे ७० टक्के जुन्या अनधिकृत इमारतींना फायदा होणार आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून जीव मुठीत धरून रहात असणाऱ्या रहिवाशांना सुविधा मिळण्यासाठी अशा इमारतींचा पुनर्विकासाकरीता स्वतंत्र धोरण निश्चित करावे, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. सदर मागणी मान्य करून मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र धोरण निश्चित करणाऱ्या आदेशांवर स्वाक्षरी केली. त्यासंबंधीचे अधिकृत आदेशही लवकरच जारी केले जाणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Rashmi Sukhla : माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट!

प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर घेतली निवृत्ती मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी

दिल्लीकरांसाठी महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीची मेजवाणी

९ ते ११ जानेवारीदरम्यान ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत नवी दिल्ली : दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण

मुंबई उपनगरीय रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक

मध्य व पश्चिम रेल्वेवरील सेवांमध्ये बदल मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वे पायाभूत सुविधांची देखभाल व

ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह बोगद्याचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

केंद्राकडून ६८ कोटींचा निधी उपलब्ध मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासह जलद प्रवासासाठी ऑरेंज गेट ते मरीन

नको सुट्ट्या पैशाची कटकट... तिकीट काढा झटपट...!

एसटीच्या यूपीआयमार्फत तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)

दहिसर-काशीगाव ‘मेट्रो ९’ टप्पा लवकरच सुरू होणार

सीएमआरएस चाचण्या अंतिम टप्प्यात मुंबई : 'दहिसर -भाईंदर मेट्रो ९' मार्गिकेतील दहिसर–काशीगाव टप्प्यातील सुरक्षा