अमरावतीत पोलीस स्टेशनवर दगडफेक, १० ते १२ पोलीस जखमी!

  97

पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराचे नळकांडे फोडले


अमरावती : अमरावती येथील नागपुरी गेट पोलिस ठाण्यात निवेदन देण्यासाठी आलेला जमाव हिंसक बनल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. हिंसक जमावाने केलेल्या गदडफेकीत १० ते १२ पोलीस जखमी झाले. यानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गाझीयाबादमधील महंत यतिनरसिंहानंद यांनी मुस्लीम धर्मगुरुबाबात केलेल्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना भडकविल्याचा आरोपावर एफआयआर दाखल करण्याची मागणी करत, मुस्लीम समाजाचा एक गट नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी पोहोचला. मात्र त्यानंतर अचानक काही आक्रमक लोकांच्या जमावाने पोलिस स्टेशनवर दगडफेक सुरु केली आणि वातावरण तापले. पोलिसांनी रोखण्याचाप्रयत्न केला असता जमाववाढत गेला आणि पुन्हा पोलिस स्टेशनवर दगडफेक सुरु झाली. यामध्ये १० ते १२ पोलीस जखमी झाले. तर पोलिसांच्या एका गाडीची तोडफोड करण्यात आली. जमाव वाढत असल्याचे पाहून तत्काळ या ठिकाणी पोलिसांचा प्रचंड फौजफाटा जमा झाला आणि जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जमावाला पांगविण्याची कारवाई सुरु होती.


सध्या परिसरात सीपी नवीनचंद्र रेड्डीं, डीसीपी, एसीपींसह १२०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच स्थिती नियंत्रणात राहावी म्हणून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. यासोबत धार्मिक स्थळावरून सुद्धा लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी