अमरावती : अमरावती येथील नागपुरी गेट पोलिस ठाण्यात निवेदन देण्यासाठी आलेला जमाव हिंसक बनल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. हिंसक जमावाने केलेल्या गदडफेकीत १० ते १२ पोलीस जखमी झाले. यानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझीयाबादमधील महंत यतिनरसिंहानंद यांनी मुस्लीम धर्मगुरुबाबात केलेल्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना भडकविल्याचा आरोपावर एफआयआर दाखल करण्याची मागणी करत, मुस्लीम समाजाचा एक गट नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी पोहोचला. मात्र त्यानंतर अचानक काही आक्रमक लोकांच्या जमावाने पोलिस स्टेशनवर दगडफेक सुरु केली आणि वातावरण तापले. पोलिसांनी रोखण्याचाप्रयत्न केला असता जमाववाढत गेला आणि पुन्हा पोलिस स्टेशनवर दगडफेक सुरु झाली. यामध्ये १० ते १२ पोलीस जखमी झाले. तर पोलिसांच्या एका गाडीची तोडफोड करण्यात आली. जमाव वाढत असल्याचे पाहून तत्काळ या ठिकाणी पोलिसांचा प्रचंड फौजफाटा जमा झाला आणि जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जमावाला पांगविण्याची कारवाई सुरु होती.
सध्या परिसरात सीपी नवीनचंद्र रेड्डीं, डीसीपी, एसीपींसह १२०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच स्थिती नियंत्रणात राहावी म्हणून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. यासोबत धार्मिक स्थळावरून सुद्धा लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.
आग्रा : उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये एक धक्कादायक आणि चटपटीत घटना घडली आहे. एका विवाहितेच्या खोलीतून…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…