आता परदेशात दिवाळी फराळ पाठवा पोस्टाने!

ठाणे डाक विभागाची विशेष सुविधा


ठाणे : भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी या सणाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. सुख, समृद्धी, प्रकाश आणि चैतन्याचे प्रतीक म्हणून हा सण भारताबरोबरच संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.


दिवाळी सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यातील खमंग असा फराळ... लाडू, चिवडा, चकल्या, करंज्या आणि बरच काही..! आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठवून आपण दिवाळी सण साजरा करतो. परंतु नोकरी किंवा उद्योगाच्या कारणांमुळे विदेशामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांना या मात्र आईच्या हाताची चव असलेल्या खमंग फराळाला मुकावे लागते. मात्र या विदेशातील भारतीयांपर्यंत दिवाळी फराळ पोहोचवण्यासाठी डाक विभाग पुढे आलेला आहे.


ठाणे विभागातील बरेचसे उच्चशिक्षित तरुण-तरुणी जगातील विविध देशात कार्यरत आहेत आणि आपल्या कर्तृत्वाने भारताचे नाव उंचावत आहेत. दिवाळी सणाला आपल्या मुलांपर्यंत दिवाळीचा फराळ कसा पाठवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर असतो. याचे उत्तर ठाणे डाक विभागाने शोधून काढले आहे.


डाक विभागाच्या ठाणे विभागाने यासाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा संपूर्ण ठाणे डाक विभागात उपलब्ध करून दिली आहे. या सुविधे अंतर्गत पोस्ट ऑफीसच्या माध्यमातून जगभरात दिवाळी फराळ पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काही खास पोस्ट ऑफिसेस मध्ये फराळाचे वाजवी दरात सुरक्षीत पॅकेजींग आणि विशेष बुकींग काऊंटर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.


डाक विभागाच्या स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, ITPS या विविध आंतरराष्ट्रीय मेल सेवा उपलब्ध असून या सेवांचे दर खाजगी कुरिअर कंपन्यांच्या दरापेक्षा बरेच कमी आहेत. सोबतच जलद सेवा आणि डाक विभागाची विश्वसनीयता ही डाक विभागाच्या सेवेची वैशिष्ट्ये आहेत.


ठाणे डाक विभागाच्या या सुविधेमुळे आता पालक वर्ग आपल्या विदेशातील मुला मुलींना तसेच प्रियजनांना खास घरघुती आणि भारतीय बनावटीचे फराळ पाठवू शकणार आहेत.


या सुविधेचा लाभ ठाणे डाक विभागातील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन समीर महाजन, वरिष्ठ अधीक्षक, ठाणे डाक विभाग यांनी केले आहे.

Comments
Add Comment

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : देशभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत राज्य आणि केंद्र सरकारे प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात

अयोध्येत राम मंदिराचे काम पूर्णत्वास! मुख्य मंदिरासह सहा उपमंदिरांचेही काम पूर्ण

अयोध्या : शतकानुशतके चाललेल्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रभू श्रीरामांच्या भक्तांसाठी सर्वात मोठी आनंदवार्ता आली

आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बॅंक गॅरंटीतून देणार

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आरोग्य विभागाला निर्देश ठाणे : आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड

ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर ‘कांतारा- चैप्टर 1’ या तारखेला दिसणार ओटीटीवर!

मुंबई : ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कांतारा- चैप्टर 1’ आता लवकरच ओटीटीवर येणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये