मुंबईने २८ वर्षानंतर जिंकला इराणी चषक!

Share

मुंबई : मुंबईने तब्बल २८ वर्षांनंनतर इराणी कपवर नाव कोरले आहे. शेष भारताविरूद्धचा हा सामना पाचव्या दिवशी ड्रॉ जाहीर करण्यात आला आणि पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबई संघ विजयी घोषित करण्यात आला.

पहिल्या डावात मुंबईची घसरलेली खेळी तनुष कोटियनने पुन्हा उभारण्यास सुरूवात केली आणि शतकापर्यंत मजल मारली. त्याला मोहित अवस्थीची साथ मिळाली व या दोन फलंदाजांनी मुंबईच्या विजयाचा रस्ता सुखकर केला. मुंबईचा डाव ढासळला असताना या दोघांनी मुंबईला नवसंजीवनी दिली आणि संघाला विजयापर्यंत घेऊन गेले.

मुंबईने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात तब्बल ५३७ धावा उभारल्या. या डावात सर्फराज खानने द्विशतक झळकावले होते. तर प्रत्युत्तरात शेष भारताने कडवी झुंझ देत ४१६ धावसंखेचा टप्पा गाठला. या डावात शेष भारताकडून अभिमन्यू ईश्वरनने धमाकेदार कामगिरी केली.

मुंबईचा दुसरा डाव घसरत असताना सलामीवीर पृथ्वी शॉने अर्धशतक झळकावत मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु शेष भारताचा फिरकीपटू सारांश जैन मुंबईवर भारी पडला आणि त्याने मुंबईचा अर्धा संघ माघारी पाठवला. परंतु पहिल्या डावात अर्धशतक झळकावलेल्या तनुष कोटियनच्या शतकाने व मोहित अवस्थीच्या अर्धशतकाने मुंबईला विजयी घोषित केले.

मुंबईच्या दुसऱ्या डावात सलामीवीर पृथ्वी शॉ एका बाजूने मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करत होता, तर दुसऱ्या बाजूने मुंबईचा डाव घसरत होता. त्याचा साथीदार आयूष म्हात्रेदेखील १४ धावांवर माघारी परतला. कर्णधार अजिंक्य रहाणेही अवघ्या ९ धावा करून परतला. तरीही पृथ्वी शॉ एकहाती खिंड लढवत होता. परंतु शेवटी ३४ व्या शतकात पृथ्वी शॉ देखील ७६ धावा करत सारांश जैनच्या गोलंदाजीवर बाद झाला. पृथ्वी शॉने ८ चौकार व एका षटकारासह १०५ चेंडूत ७६ धावा केल्या.

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

2 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

3 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

3 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

3 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

4 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

4 hours ago